AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवा, इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका; राऊतांनी सगळं सांगितलं!

इंडिया आघाडीतील बैठकीत एक आराखडा ठरला आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे भारताच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले जाणार आहे. त्यात एसआयआरचा विषय असेल. नीट पेपरफुटीचा विषय असेल, विषयी लिहिले जाणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवा, इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका; राऊतांनी सगळं सांगितलं!
sanjay raut and indian allianceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 6:01 PM
Share

India Alliance Meeting : इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर महत्त्वाच्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत एकूण पाच मुद्द्यांवर विरोधी पक्षांची सहमती झाल्याचे समोर आले आहे. तसेच आगामी ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा इंडिया आघाडीची बैठक पार पडेल, असेही सांगण्यात आले आहे. याच बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवारी निवडला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. खासदार संजय राऊत यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.

म्हणूनच आपण पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला पाहिजे

संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना, सत्ता आम्हाला हवी आहे, हे सांगितलं तर तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, असं लोक विचारतात. म्हणूनच आपण पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे. लोकांपुढे हा चेरहा येऊ दिला पाहिजे. देशाचं नेतृत्त्व करणारा हा आमचा चेहरा आहे, असे आपण लोकांना दाखवले पाहिजे, असेही मत ठाकरे यांनी मांडले. महागाई, घोटाळे, बेरोजगारी असेही काही मुद्दे आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत एकूण तीन मुद्दे मांडले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

इंडिया आघाडीची पुढची बैठक…

तसेच, इंडिया आघाडीतील बैठकीत एक आराखडा ठरला आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे भारताच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले जाणार आहे. त्यात एसआयआरचा विषय असेल. नीट पेपरफुटीचा विषय असेल, विषयी लिहिले जाणार आहे. इंडिया आघाडीची पुढची बैठक ऑगस्ट महिन्यात घेण्याचेही ठरले आहे. ती बैठक हैदराबाद येथे होईल. दीड महिन्यांत आम्ही वारंवार भेटत राहू, यावरही आमचे एकमत झाले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काय भूमिका?

कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन झाले. याविषयी बैठकीत काही चर्चा झाली का? असेही संजय राऊत यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना, “अनेकांनी कॉकरोच जनता पार्टीविषयी आपली मतं मांडली. देशातील तरुणांत रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी हा मंच तरुणांना मिळत आहे. परंतु काँग्रेस पक्षाने यापेक्षाही अनेक मोठी आंदोलनं केली आहेत. अनेक राज्यांत हे आंदोलन सुरू आहे. नीटच्या प्रकरणात लाठीहल्ले झाले आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तरीदेखील आपण रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू, असे सगळ्यांचे मत आहे,” अशी महत्त्वाची माहिती संजय राऊत यांनी दिली.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Aaditya Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप