AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजीव खन्ना असतील नवीन CJI; सरन्यायाधीश चंद्रचुड यांची शिफारस, त्यानंतर महाराष्ट्रातील या न्यायमूर्तीच्या नावाची चर्चा

Supreme Court CJI : सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी नावाची शिफारस केली आहे. केंद्र सरकारला त्यांनी याविषयीचे पत्र लिहिले आहे. त्यानुसार न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. तर राज्यातील वकिलांमधील लोकप्रिय न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

संजीव खन्ना असतील नवीन CJI; सरन्यायाधीश चंद्रचुड यांची शिफारस, त्यानंतर महाराष्ट्रातील या न्यायमूर्तीच्या नावाची चर्चा
संजीव खन्ना यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
| Updated on: Oct 17, 2024 | 11:37 AM
Share

सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. एका वृत्तानुसार, त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यांनी 1983 साली वकिलीला सुरुवात केली होती. त्यानंतर देशात लवकरच दुसरा एससी सरन्यायाधीश असेल. राज्यातील वकिलांमधील लोकप्रिय न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पुढील CJI चे नाव पक्कं

केंद्र सरकारला सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे 13 मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले होते. तर न्यायमूर्ती खन्ना हे 18 जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जज झाले. यापूर्वी त्यांनी हायकोर्ट आणि इतर न्यायाधिकरणावर सेवा दिली आहे.

6 महिने CJI पदावर

NALSA म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर न्यायमूर्तींच्या सेवानिवृत्तीची तारीख समोर येते. त्यानुसार, न्यायमूर्ती खन्ना हे 13 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतली तर ते या पदावर सहा महिने कार्यरत असतील.

न्यायमूर्ती बी आर गवई

दुसरे एससी न्यायमूर्ती मिळणार

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते मे 2025 मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळू शकतात. ते देशातील दुसरे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्यायमूर्ती केजी बालकृष्ण हे देशातील पहिले एससी सरन्यायाधीश होते. ते 11 मे 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले.

न्यायमूर्ती गवई यांना इतका कालावधी

सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाल्यावर न्यायमूर्ती बी आर गवई यांना या पदावर 6 महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतील. सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळानुसार, 16 मार्च 1985 रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली. न्यायमूर्ती गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्यानंतर या पदावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव चर्चेत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.