रेल्वेसाठी आजचा दिवस असणार ऐतिहासिक, 160 KM च्या वेगाने येणाऱ्या दोन गाड्यांमध्ये होणार टक्कर, रेल्वे मंत्री असणार रेल्वेमध्ये!
भारतीय रेल्वे (Indian Railways) सतत तंत्रज्ञान विकसित करत असते. आजचा दिवस रेल्वेसाठी अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे. आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर (Collision) होणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान एका ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) स्वतः असणार आहेत.
मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) सतत तंत्रज्ञान विकसित करत असते. आजचा दिवस रेल्वेसाठी अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे. आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर (Collision) होणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान एका ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) स्वतः तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित असणार आहेत. रेल्वे आज स्वदेशी ट्रेन टक्कर संरक्षण तंत्रज्ञान ‘कवच’ ची चाचणी घेणार आहे. ही चाचणी सिकंदराबाद (Secunderabad) येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे येतील.
सिकंदराबादमध्ये होणार ‘कवच’ची चाचणी
दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने येतील. मात्र, कवचमुळे या दोन गाड्यांमध्ये टक्कर होणार नाहीये. याबाबतची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सनथनगर-शंकरपल्ली मार्गावरील प्रणालीच्या ट्रायल रनचा भाग म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सिकंदराबादला पोहोचणार आहेत. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर रेल्वे मंत्रालयाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतीय रेल्वेने विकसित केलेले हे कवच तंत्रज्ञान जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली असल्याचे मानले जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात या तंत्रज्ञानाबाबत घोषणा
2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या तंत्रज्ञानाबाबत घोषणा करण्यात आली होती. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत दोन हजार किलोमीटरचे रेल्वेचे जाळे कवच तंत्रज्ञानाखाली आणले जाणार आहे. आतापर्यंत दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये 1098 किलोमीटरहून अधिक मार्गावर आणि 65 लोकोमोटिव्हवर कवच बसवण्यात आले आहे. याशिवाय, कवच दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर कार्यान्वित करण्याची प्लान आहे, ज्याचा एकूण मार्ग सुमारे 3000 किमी आहे.
लोको पायलटच्या चुकीनंतरही होणार नाही अपघात
जीरो एक्सीडेंटचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी या टेक्नॉलॉजी रेल्वेची मदत करेल. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोको पायलटकडून चूक झाल्यास कवच प्रथम ऑडिओ-व्हिडिओद्वारे अलर्ट करेल. प्रतिसाद न मिळाल्यास ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक ब्रेक लावले जातील. यासोबतच या प्रणालीमुळे ट्रेनला निश्चित सेक्शन स्पीडपेक्षा जास्त वेगाने धावू देणार नाही. कवचमध्ये आरएफआयडी उपकरणे रेल्वे इंजिन, सिग्नल यंत्रणा, रेल्वे स्टेशनच्या आत बसवली जातील.
संबंधित बातम्या :
तुम्ही आधार कार्ड कितीदा अपडेट करू शकता; काय आहे युआयडीएआयचा नियम? जाणून घ्या