56 इंची छातीचे पंतप्रधान असताना लंडनमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा उतरतोच कसा? सामनातून शिवसेनेचा परखड सवाल

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा काही खलिस्तानवाद्यांनी उतरवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

56 इंची छातीचे पंतप्रधान असताना लंडनमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा उतरतोच कसा? सामनातून शिवसेनेचा परखड सवाल
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:55 AM

मुंबई : देशभरात हिंदुत्वाच्या (Hindutwa) नावाखाली भाजपकडून (BJP) जिहाद मोर्चे काढले जात आहेत. उद्या इतर धर्मियांनी जिहादी मोर्चा काढले तर भारतात धर्मयुद्ध माजेल, त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच सावध व्हावे, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. सामना या मुखपत्रातून शिवसेनेने लंडनमधील एका गंभीर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी भारताच्या उच्चायुक्तालयावर फडकणारा तिरंगा ध्वज खाली उतरवला. कॅनडातही तशीच स्थिती आहे. तर भारतात अशांततेची सुरुवात झाली आहे. लोकशाही, स्वातंत्र्य आणि देश धोक्यात आहे. अंध भक्तांना हे दिसत नाही, असं खोचक वक्तव्य सामनातून करण्यात आलंय.

‘पंजाबात नवे भिंद्रनवाले’

पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचे अमृतपाल सिंह यांना पंजाबचे नवे भिंद्रनवाले अशा शब्दात शिवसेनेने टीका केली आहे. पंजाबात अमृतपाल सिंह यांच्याविरोधात कारवाई सुरु होताच त्याचे पडसाद लंडनमध्ये उमटले. तेथील भारतीय उच्चायुक्तालयावरील खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. तेथे फडकणारा तिरंगा खाली उतरवला. इतकच नव्हे तर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला, असा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

’56 इंची छातीचे पंतप्रधान..’

भारताला 56 इंची छाती असलेले पंतप्रदान लाभले असताना आपला तिरंगा अशा प्रकारे उतरवण्याची हिंमत अतिरेक्यांची व्हावी, हे धक्कादायक असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं भाष्य केलं. तो देशद्रोह असल्याचा आरोप भाजपवाले करतायत. मग त्याच लंडनमध्ये हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयात घुसून खलिस्तानवाद्यांनी तिरंगा उतरवला, धुडगूस घातला हा देशाचा अपमान नाही का, असा सवाल सामनातून करण्यात आलाय.

त्यांचा हिंदुस्थान वेगळा…

पंजाबमधील अमृतपाल सिंह याच्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानातून मदत मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पंजाबमध्ये हिंदुस्थान अशांत आणि अस्थिर कऱण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. पण इथे नरेंद्र मोदी यांचं सरकार राजकीय विरोधकांच्या मागे हात धुवून लागले आहे. खलिस्तानची भुताटकी डोके वर काढत आहे. तिरंग्यास हात घालेपर्यंत त्यांची धुंदी वाढली आहे. पंजाबमध्ये भाजपचे सरकार नसल्याने केंद्र सरकार तिकडे दुर्लक्ष करते आहे. एका भिंद्रनवालेमुळे पंजाबसह देशात रक्ताच्या नद्या वाहिल्या. इंदिरा गांधींचे बलिदान त्या हिंसेत झाले. आज तिथे नवा भिंद्रनवाले निर्माण होऊ पाहतोय, पण अंध भक्तांना ते दिसत नाही, त्यांचा हिंदुस्थान वेगळा असावा, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.