AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रातून शार्क गायब होण्याच्या मार्गावर, विनाशामागे माणसाचा हात

हा बदल फक्त तापमानातच वाढ करत नाही तर यामुळे पृथ्वीवरील सजीवांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

समुद्रातून शार्क गायब होण्याच्या मार्गावर, विनाशामागे माणसाचा हात
| Edited By: | Updated on: Jan 28, 2021 | 10:24 AM
Share

नवी दिल्ली : वारंवारच्या हवामान बदलांमुळे (Climate Change) आता तज्ञांची चिंता वाढत चालली आहे. खरंतर, आपण आपल्या वैयक्तीक आयुष्याला घेऊन जगत असलो तरी हवामानातील होणारे बदल विसरू शकत नाही. कारण, त्यामुळे थेट आपल्या जगण्यावर परिणाम होतो. हा बदल फक्त तापमानातच वाढ करत नाही तर यामुळे पृथ्वीवरील सजीवांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. यासंबंधी बुधवारी जर्नल नेचरमध्ये एक अभ्यासही प्रसिद्ध झाला आहे. यातला एक भाग म्हणजे जागतिक स्तरावर समुद्री शार्कची (Shark) संख्या वेगाने कमी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. (Shocking environment news oceanic shark population dropped by more than 70 percent says study)

या अभ्यासात दिल्याप्रमाणे 1970 ते 2018 च्या वर्षात शार्कच्या संख्येत 70 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामुळे शार्क आणि रेजच्या 31 पैकी 24 प्रजाती नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. स्कॅलोप्ड हॅमरहेड शार्क्स आणि ग्रेट हॅमरहेड शार्क यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. कॅनडाच्या सिमन फ्रेझर विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक नॅथन पायकोरू म्हणाले की, “जागतिक पातळीवर गेली 50 वर्षे शार्क प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.”

शार्कचीही केली जाते शिकार

अधिक माहितीनुसार, इतर समुद्रातील प्राणी आणि मासे पकडताना शार्कची सुद्धा जाणीवपूर्वक शिकार केली जाते. मोठ्या समुद्रांमध्ये यासाठी ओळखल्या वाहनांची संख्याही वाढली आहे. यामुळे समुद्रातही वारंवार जाळं टाकलं जातं. अनेक पद्धतींनी याचा व्यवसायही वाढला आहे.

पर्यावरणाचं संतुलन राखणं आवश्यक

ड्यूक युनिव्हर्सिटीचे इकोलॉजिस्ट स्टुअर्ट पिम यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “जेव्हा समुद्रातून मोठे मासे आणि इतर प्राणी काढले जातात तेव्हा त्याचा परिणाम समुद्राच्या संपूर्ण अन्न साखळीवर होतो.” शार्क हे समुद्राच्या जगातले सिंह, चित्ता आणि अस्वलसारखे आहेत. संपूर्ण इकोसिस्टममध्ये सुंतलन राखण्यासाठी त्यांना हे वातावरण आवश्यक आहे. पण दुर्देवाने माणसाने प्रगती करण्याच्या मोहात पर्यावरणाचा ऱ्हास सुरू ठेवला आहे. यामुळे पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला धोका निर्माण झाला आहे. (Shocking environment news oceanic shark population dropped by more than 70 percent says study)

संबंधित बातम्या – 

Health Tips | पेरूच्या पानांचा आरोग्यवर्धक ‘हर्बल चहा’, नियमित सेवनाने होतील अनेक फायदे!

Good Habits | जमिनीवर बसून जेवण्याचे ‘हे’ फायदे वाचाल, तर टेबल-खुर्चीला ‘गुडबाय’ म्हणाल!

श्रीनगरला फिरायला जाताय, ‘ही’ ठिकाणं नक्की पाहा

Digestion Problem | औषधांना ‘गुडबाय’ म्हणा, अन्न पचवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक पद्धतींचे अनुसरण करा!

(Shocking environment news oceanic shark population dropped by more than 70 percent says study)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली