AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Murder Case: आफताबचे कुटुंब झाले भूमिगत, दिल्ली आणि मुंबई पोलीस घेत आहेत शोध

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याचे कुटुंबीय भूमिगत झाले आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Shraddha Murder Case: आफताबचे कुटुंब झाले भूमिगत, दिल्ली आणि मुंबई पोलीस घेत आहेत शोध
श्रद्धा वालकर हत्याकांड Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 20, 2022 | 7:53 PM
Share

नवी दिल्ली, श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder) प्रकरणी घटनेचा उलगडा करण्यासाठी दिल्ली पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळी पथके वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत आहेत. एक पथक मुंबईतही तपस करीत असल्याचे समजते. पोलिसांनी वसई परिसरातील रिगल इमारतीत चौकशी केली, जिथे श्रद्धा आणि आफताब (Aftab) राहत होते. आफताबला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कुटुंब भूमिगत झाले आहे. महाराष्ट्रातील नयानगर पोलिस आणि माणिकपूर पोलिसांनी कुटुंबाच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.

सगळ्यांचे मोबाईल बंद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी नया नगरमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. पण आता कुटुंब तिथे नाही. आफताबचे आई-वडील आणि भावाचे फोनही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आरोपीच्या मित्रांनाही त्याच्या कुटुंबीयांची माहिती नाही. खरं तर, या खटल्याशी संबंधित एका साक्षीदाराने दावा केला होता की आरोपीच्या कुटुंबाला श्रद्धाच्या रोजच्या मारहाणीची माहिती होती आणि त्यांनी आफताबला संरक्षण दिले होते. त्यामुळे या घटनेशी संबंधित महत्त्वाची माहिती कुटुंबाला असू शकते. भूमिगत झाल्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला आहे.

मुंबईच्या वसईला लागून असलेल्या नालासोपारा येथील रहिवासी पूनम बिर्लान यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, जेव्हा श्रद्धा आणि आफताब एव्हर शाइन परिसरात राहायला आले तेव्हा श्रद्धा त्यांच्याकडे तीनदा मदत मागण्यासाठी आली होती. एकदा पूनमने श्रध्दासोबत तुळींज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एफआयआर नोंदवण्याची तयारी करण्यात आली. श्रध्दाही तयार होती. मात्र आरोपीच्या पालकांनी श्रद्धाची समजूत काढली होती. आफताबला त्याच्या आई-वडिलांनी संरक्षण दिल्याचा आरोप पूनमने केला होता.

दिल्ली पोलीस करत आहेत तलाव रिकामे

या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती हाती लागली आहे आहे. त्या आधारे पोलीस छतरपूर एन्क्लेव्हमधील तलाव रिकामे करण्यात गुंतले आहेत. वास्तविक, खूनी आफताब याने श्रद्धाचे शीर याच तलावात फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. महापालिकेच्या पथकासह पोलीस श्रद्धाच्या डोक्याचा शोध घेत आहेत. येथून पोलिसांना शीर वर काढल्यास प्रकरणाचा उलगडा होण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे मानले जात आहे. मात्र, हत्त्येत वापरलेले शस्त्र शोधणे हे अजूनही पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.