AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पाकिस्तानात कोणी म्हटले, दाऊदची बातमी खरी असले तर आनंदच

don dawood news arzoo kazmi | मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी पत्रकार आणि आरजू काजमी हिने आपल्या यु ट्यूब चॅनल Arzoo Kazmiवर सर्वात प्रथम दिली. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Video | पाकिस्तानात कोणी म्हटले,  दाऊदची बातमी खरी असले तर आनंदच
Arzoo Kazmi and dawood ibrahim
| Updated on: Dec 18, 2023 | 10:07 AM
Share

नवी दिल्ली, दि.18 डिसेंबर | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती पाकिस्तानी सोशल मीडियातून आली. पाकिस्तानी पत्रकार आणि आरजू काजमी हिने आपल्या यु ट्यूब चॅनल Arzoo Kazmiवर सर्वात प्रथम ही बातमी दिली. त्यात अनेक दावे करण्यात आले आहे. तिने म्हटले आहे की, ही बातमी कितपत खरी आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. परंतु बातमी सत्य नसती, बातमीत तथ्य नसते तर पाकिस्तानी सोशल मीडिया डाऊन झाले नसते. कारण भारताने किंवा अफगाणिस्ताने पाकिस्तानवर हल्ला केला नाही. पाकिस्तानात युद्ध सुरु झाले नाही. पाकिस्तानात सर्व काही सुरळीत सुरु आहे. त्यानंतर सोशल मीडिया का बंद केला? दाऊदच्या बातमीसंदर्भात जावेद मियांदाद याच्याकडून दुजोरा घेतला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. जावेद मियांदाद हा दाऊद यांचा व्याही आहे, असे आरजू काजमी हिने म्हटले आहेच

दाऊदची प्रकृती चिंताजनक

आरजू काजमी हिने व्हिडिओत म्हटले आहे की, दाऊद याच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यासंदर्भातील बातम्या बाहेर येऊ नये, यामुळे सोशल मीडिया डाऊन करण्यात आले आहे. पाकिस्तानात वरिष्ठ पातळीवर काही तरी मोठे सुरु आहे. दाऊद याची बातमी खरी असली तर लोकांसाठी चांगलीच असणार आहे. कारण या पद्धतीने दहशतवादी संपवले जात आहे. यामुळे पाकिस्तानात जे दहशतवादी आहेत, त्यांनाही संदेश दिला जाणार आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तानात जे दहशतवादी मारले गेले ते दहशतवादी संघटनेचे प्रमुख किंवा सर्वात महत्वाची व्यक्ती नव्हते. परंतु दाऊद मारला गेला असले तर प्रथमच मोठ्या दहशतवाद्यास हात लावला गेला आहे. तसेच या माध्यमातून त्या मुख्य दहशतवाद्यांना संदेश पोहचवला गेला आहे. दाऊद हा भारतीय आहे. भारताने अनेक वेळा दावा केला की, तो कराचीत राहत आहे. भारतीय माध्यमांनी त्याचे कराचीतील घर अनेक वेळा दाखवले आहे.

या मोठ्या दहशतवाद्यांना संदेश

पाकिस्तानातील हाफिज सईद, सय्यद सल्लाउद्दीन, मसूद अजहर या मोठ्या दहशतवाद्यांना दाऊदच्या माध्यमातून संदेश दिला गेला आहे. कारण हे बडे दहशतवादी आहे. दहशतवादी संघटनेचे मोरखे आहेत. ही लोक संपूर्ण दहशतवादी संस्था चालवतात. अनेक लोकांची हत्या करतात, असे आरजू काजमी हिने म्हटले आहे. पाकिस्तानात एकामागे एक दहशतवादी मारले जात आहे. पाकिस्तानच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत दहशतवादी मारले जात आहे. साजीद मीर या दहशतवाद्याला कारागृहात विष दिले गेले आहे. पाकिस्तान आर्मी चीफ अमेरिकेत आहे. त्याच्या या दौऱ्यात खूप काही घडले आहे, असे तिने म्हटले. पाकिस्तानात दहशतवाद्यांची होत असलेल्या हत्येमुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. पाकिस्तानने नेहमी या दहशतवाद्यांना वाचवले आहे. आमचे सत्तेत असलेले राजकारणी या सर्व दहशतवाद्यांना नेहमी हाफीज साहब म्हणत असतात. जिहादसाठी पाकिस्तानात ठिकठिकाणी डोनेशन बॉक्स ठेवले आहे. त्या ठिकाणी महिला आपले दागिनेसुद्धा टाकत असतात.

Follow Us
शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय कधी? दत्तात्रय भरणेंनी तारीख सांगितली
शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय कधी? दत्तात्रय भरणेंनी तारीख सांगितली.
विरोधी पक्षाचे लोक वोट जिहादमुळे निवडून आले; किरीट सोमय्यांचा आरोप
विरोधी पक्षाचे लोक वोट जिहादमुळे निवडून आले; किरीट सोमय्यांचा आरोप.
सोन्या-चांदीच्या दरांत सलग दुसऱ्या दिवशी घसरण! काय आहेत दर?
सोन्या-चांदीच्या दरांत सलग दुसऱ्या दिवशी घसरण! काय आहेत दर?.
T20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये भारत-इंग्लंड आज आमनेसामने
T20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये भारत-इंग्लंड आज आमनेसामने.
राष्ट्रवादीचं विलीनीकरण वगैरे सगळ्या दंतकथा! संजय राऊतांचं मोठं विधान
राष्ट्रवादीचं विलीनीकरण वगैरे सगळ्या दंतकथा! संजय राऊतांचं मोठं विधान.
मुंबईमध्ये दत्तात्रय भरणेंच्या घराबाहेर आंदोलन; काय घडलं?
मुंबईमध्ये दत्तात्रय भरणेंच्या घराबाहेर आंदोलन; काय घडलं?.
बोगस आधारकार्ड तयार करून मतदान केलं जातंय; पडळकरांचा गंभीर आरोप
बोगस आधारकार्ड तयार करून मतदान केलं जातंय; पडळकरांचा गंभीर आरोप.
मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट 39 अंशांवर
मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट 39 अंशांवर.
ई-चलनाविरोधात आझाद मैदानात वाहतूकदारांचे आंदोलन
ई-चलनाविरोधात आझाद मैदानात वाहतूकदारांचे आंदोलन.
आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.