AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देशातील गरिब, होतकरु जनतेला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत 10 किलो अन्नधान्य द्यावं, अशी मागणी केली आहे (Sonia Gandhi letter to PM Modi).

पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र
| Updated on: Apr 13, 2020 | 6:03 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करणाऱ्या देशातील लाखो गरिबांना (Sonia Gandhi letter to PM Modi ) दर महिन्याला 10 किलो अन्नधान्य मोफत द्या, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देशातील गरिब, होतकरु जनतेला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत 10 किलो अन्नधान्य द्यावं, अशी मागणी केली आहे (Sonia Gandhi letter to PM Modi).

“देशातील लाखो गरिब नागरिक कोरोनाविरोधाच्या लढाईत झुंझत आहेत. त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचा पुरवठा होणं गरजेचं आहे. केंद्र सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी गरिब आणि होतकरु जनतेला पुढील 6 महिन्यांसाठी मोफत 10 किलो अन्नधान्य द्यावं. याशिवाय या योजनेसाठी गरिबांना रेशन कार्डची सक्ती करु नये. कारण देशाच्या विविध भागात अनेक स्थलांतरीत मजूर अडकलेले आहेत”, असं सोनिया गांधी पत्रात म्हणाल्या आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे हातावरती पोट असणाऱ्या लाखो मजुराचं आणि कुटुंबांचं मोठं नुकसान झालं आहे. या नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलं आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी या नागरिकांना 5 किलो अन्नधान्य मोफत दिलं जाणार आहे. मात्र, हीच मदत 10 किलोपर्यंत वाढवण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या संपणार आहे. मात्र, देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजारच्या पार गेला आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन सरकार 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

अदृश्य शत्रूविरुद्ध महायुद्ध, राहुल गांधींच्या सूचना मोदींनी ऐकायला हव्या होत्या : बाळासाहेब थोरात

‘या’ राज्यांमध्ये मद्यविक्री पुन्हा सुरु, तळीरामांच्या रांगाही लागल्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.