AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षणाची दुर्दशा, दहावीत आले पण दुसरीचे मातृभाषेचे पुस्तक वाचता येईना

Education: पालक मुला, मुलींना शाळेत पाठवत आहेत. यामुळे मुले, मुली शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु शाळेत जाऊन मुले करता काय? असा प्रश्न निर्माण करणारा अहवाल आला आहे. या अहवालातील निष्कर्षामुळे देशातील शिक्षणाची दुर्दशा समोर आली आहे.

शिक्षणाची दुर्दशा, दहावीत आले पण दुसरीचे मातृभाषेचे पुस्तक वाचता येईना
| Updated on: Jan 18, 2024 | 9:55 AM
Share

नवी दिल्ली, दि.18 जानेवारी 2024 | देशात प्राथमिक शिक्षणासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे. मुले, मुली शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु शाळेत जाऊन मुले करता काय? असा प्रश्न निर्माण करणारा अहवाल आला आहे. दहावीच्या मुलांना दुसरेचे मातृभाषेतील पुस्तक वाचता येत नाही. ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजेच असर या संस्थेकडून देशातील १४ ते १८ या वयोगटातील मुलांची पाहणी करण्यात आली. त्या पाहणीतील निष्कर्ष शिक्षण क्षेत्रातील विदारक परिस्थिती मांडणारे आहे. देशातील सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतील दुसरीचे पुस्तकही योग्य पद्धतीने वाचता येत नाही.

कसे करण्यात आले सर्वेक्षण

देशातील २६ राज्यांमधील २८ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. १४ ते १८ वयोगटातील मुलांची निवडण सर्वेक्षणासाठी करण्यात आली. एकूण ३४ हजार ७४५ विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न विचारण्यात आले. देशातील प्रत्येक राज्यांमधील एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १४ ते १८ वयोगटातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना एक ते तीन अंकापर्यंतची आकडेमोडी करता आले नाही. ५७.३ टक्के मुलांनी इंग्रजीतील वाक्ये वाचली. परंतु त्याचा अर्थ तीन चतुर्थांश मुले सांगू शकली नाही.

मुलांच्या तुलनेत मातृभाषेत मुली हुशार

मुलांच्या तुलनेत मुली चांगले वाचताना दिसून आल्या. मुलींनी मातृभाषेतील दुसरीचा धडा चांगला वाचला. परंतु गणित आणि इंग्रजीमध्ये मुले अधिक चांगली कामगिरी केली. १४ वर्ष वयाची ३.९ टक्के मुले शिक्षण घेत नाही. परंतु हे प्रमाण अठरा वर्षापर्यंत वाढून ३२.६ टक्के झाले. म्हणजे शिक्षणात गळतीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास सर्वच मुलांच्या घरी स्मार्टफोन आहे. परंतु त्यातील ८० टक्के मुले केवळ मनोरंजनासाठी स्मार्टफोन वापरत असल्याचे दिसून आले.

ही सकारात्मक बाब

सहा ते १४ या वयोगटातील मुलांच्या शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१० मध्ये ९६.६ मुले शाळेत आले होते. ते २०२२ मध्ये ९८.४ टक्क्ये झाले आहे. विज्ञान, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स या शाखांमध्ये प्रवेश घेण्याचे मुले मुलींपेक्षा आघाडीवर आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.