AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालयाचा सीबीएसईच्या दोन प्रादेशिक भाषांच्या सक्तीवर स्थगिती देण्यास नकार

CBSE Language Policy : सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) CBSE च्या नव्या भाषा धोरणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सीबीएसईच्या दोन प्रादेशिक भाषांच्या सक्तीवर स्थगिती देण्यास नकार
Supreme Court on CBSE Language Policy Image Credit source: Google
| Updated on: May 27, 2026 | 6:29 PM
Share

सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) CBSE च्या नव्या भाषा धोरणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला. या धोरणानुसार इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले असून त्यापैकी किमान दोन भारतीय किंवा प्रादेशिक भाषा असणे आवश्यक आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत केंद्र सरकार, CBSE आणि NCERT यांना नोटीस बजावत उत्तर मागवले आहे.

पुढील सुनावणी 15-16 जुलैला होणार

मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांचा समावेश आहे. आता या खंडपीठाने पुढील सुनावणी 15 आणि 16 जुलै रोजी घेण्याचे ठरवले आहे. याचिकाकर्त्यांनी 1 जुलैपासून लागू होणाऱ्या या नव्या धोरणावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने सध्या कोणतेही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला.

3 भाषा शिकणे बंधनकारक

CBSE च्या अलीकडील परिपत्रकानुसार, 1 जुलैपासून इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे बंधनकारक असेल. या नव्या व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील आणि त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय मूळाच्या असणे आवश्यक असेल. ही व्यवस्था राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-SE) 2023 नुसार लागू केली जात आहे.

याचिकांमध्ये काय मागणी?

याचिकांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक ताण वाढू शकतो आणि हिंदीतर राज्यांमध्ये व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भाषिक निवडीच्या स्वातंत्र्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी या धोरणाच्या घटनात्मक वैधतेचा पुनर्विचार करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

दोन आठवड्यात उत्तर द्यावे लागणार

CBSE ची ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत प्रस्तावित तीन-भाषा सूत्राचा भाग आहे. विद्यार्थ्यांना भारतीय भाषांशी जोडणे आणि मातृभाषा आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या धोरणामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. आता CBSE, केंद्र सरकार आणि NCERT यांना दोन आठवड्यांच्या आत आपले उत्तर सादर करावे लागणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय या धोरणाबाबत पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल