AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून लोकांना कामच करायचे नाही, फुकट राशन आणि पैशावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, असे घातले डोळ्यात अंजन

Supreme Court on Rationing Scheme : सरकारच्या विविध फुकट योजनांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. या योजनांमुळेच लोकांची काम करण्याची इच्छा शक्ती कम होत असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. काय म्हणाले न्यायालय?

...म्हणून लोकांना कामच करायचे नाही, फुकट राशन आणि पैशावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, असे घातले डोळ्यात अंजन
सरकारचे टोचले कान
| Updated on: Feb 12, 2025 | 3:23 PM
Share

सर्वोच्च न्यायालयाने फुकट योजनांवरून सरकारचे चांगलेच कान टोचले. तर निवडणुकीपूर्वी करण्यात येणार्‍या मोफत घोषणांचा सुद्धा कोर्टाने खरपूस समाचार घेतला. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकाराची निंदा केली नाही तर चिंता पण व्यक्त केली. या फुकट योजनांमुळेच देशातील लोकांची काम करण्याची इच्छा नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. शहरी भागातील बेघर व्यक्तींना आश्रय देण्याविषयीच्या अधिकारांविषयी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने मत नोंदवले. न्यायमूर्ती गवई यांनी या योजनांच्या परिणामांविषयी मत मांडले. दुर्दैवाने या मोफत सुविधांमुळे लोक काम करायला तयार नाहीत. त्यांना मोफत रेशन मिळत आहे. कोणतेही काम न करता त्यांना पैसे मिळत आहेत, अशी टिप्पणी न्या. गवई यांनी केली.

याचिकेवर 6 आठवड्यानंतर सुनावणी

केंद्र सरकार शहरी भागात गरीब मुक्त योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या तयारीत आहे. त्यातंर्गत शहरी भागातील बेघरांना राहण्याची व्यवस्थेसह इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची बाजू ॲटर्नी जनरल आर. वेकंटरमणी यांनी मांडली. त्यावर शहरी भागात गरीब मुक्त अभियान राबविण्यास अजून किती वेळ लागेल याची माहिती सादर करण्याचे निर्देश कोर्टाने केंद्र सरकारला दिले. त्यानंतर याप्रकरणावर पुढील सहा आठवड्यापर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली.

750 हून अधिक बेघारांचा मृत्यू

केंद्र सरकारने बेघरांचा मुद्दा न्यायपीठासमोर मांडला. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्याकडे पैसे नसल्याने बेघरांसाठी योजना राबवताना अडचण येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक बेघर हे रस्त्यावर जीवन जगण्यास मजबूर झाले आहे. या थंडीत 750 हून अधिक बेघारांचा मृत्यू झाल्याची बाजू केंद्र सरकारने मांडली.

यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मोफत योजनांवरून केंद्र सरकारचे कान टोचले होते. गेल्यावर्षी राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या मोफत योजनांच्या घोषणांविषयी याचिका दाखल झाली होती. त्यावर केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे न्यायालयाने विचारणा केली होती.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल