AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्खनन करताना सापडला अब्जोंचा खजाना, अधिकारी पळत आले घटनास्थळी,काय घडले नेमके?

कारखानदारी आणि इतर औद्योगिक विकासापासून वंचित राहिलेल्या उत्तर प्रदेशात आता मोठा खजाना सापडला आहे. जर सर्वकाही ठरल्यानूसार झाले तर उत्तर प्रदेशात विकासाची गंगा वाहू लागेल....

उत्खनन करताना सापडला अब्जोंचा खजाना, अधिकारी पळत आले घटनास्थळी,काय घडले नेमके?
| Updated on: Feb 08, 2025 | 5:43 PM
Share

उत्तरप्रदेशातील बदायू जिल्ह्याचे नशीब चमकले आहे. या जिल्ह्यात आता विकासाची गंगा वाहणार आहे. कारण देखील तसेच घडले आहे. बदायू जिल्ह्यात जमीनीच्या खाली कच्च्या तेलाचे मोठे साठे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. या शोधाचा शास्रीय पद्धतीने धांडोळा करण्यासाठी अल्फाजिओ ( इंडिया ) ही कंपनी कामाला लागली आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उघैती क्षेत्रातील टिटौली गावात डेरा टाकून आहेत. संभाव्य तेल भांडाराचा सखोल शोध सुरु आहे.

वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरु

अनेक महिन्यांपासून अल्फाजिओ इंडीया ही कंपनी उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील विविध क्षेत्रात वैज्ञानिक पद्धतीने कच्च्या तेलाचा शोध घेत आहे. कंपनीची विशेष टीम बोरिंग तंत्राने आणि जीपीएस सॅटेलाईटद्वारे या खनिज संपत्तीचा शोध घेत आहे.

बोरिंग प्रक्रिया : संभाव्य क्षेत्रात ट्रायपॉड लावून बोरिंग खणण्याचे काम सुरु आहे.

ब्सास्टींग तंत्रज्ञान : बोरिंगनंतर शुटर मशिनने जमिनीत हल्का ब्लास्ट केला जातो

जीपीएस ट्रॅकींग : सॅटेलाईट सिस्टीम द्वारे डेटा जमा करुन संशोधन सुरु आहे.

काही स्थानांवर डीझेल आणि पेट्रोल असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे येथे ही प्रक्रीया वेगाने केली जात आहे. संपूर्ण परीक्षण पूर्ण झाल्यानंतर विस्तृत रिपोर्ट भूगर्भ वैज्ञानिकांकडे सोपवला जाणार आहे. त्यानंतरच बदायुच्या जमीनीत नेमके किती कच्चे तेल अस्तित्वात आहे हे समजू शकणार आहेत.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

तेल शोधण्याच्या प्रक्रीयेत शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्याची योजना आखली आहे. ज्याची जमीन या प्रभावित भागात मोडते त्यांना एक पावती दिली जात आहे. त्यात त्याचे नाव, गाव, बँकेचे तपशील आणि प्रभावित क्षेत्राची माहिती नमूद केले जात आहे. त्याआधारे नुकसान भरपाईची रक्कम ठरविली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम त्वरित पाठविली जात आहे. जर कोणत्या शेतात तेलाचा साठा सापडला तर स्वतंत्र वेगळी रक्कम दिली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रीयेचा इतर शेतकाऱ्यांच्या शेतीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांची शेती ते नेहमी प्रमाणे करु शकतात असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....