AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत बांगलादेश बॉर्डरवर तणाव, रातोरात 40 जण बेपत्ता, थेट बीएसएफने..

भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच बॉर्डरवर धक्कादायक घटना घडली. दोन्ही सैन्य अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तणाव कमी व्हायचे तर वाढत आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात भारतात मोठी कारवाई सुरू आहे.

मोठी बातमी! भारत बांगलादेश बॉर्डरवर तणाव, रातोरात 40 जण बेपत्ता, थेट बीएसएफने..
India Bangladesh border
| Updated on: Jun 07, 2026 | 8:38 AM
Share

भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळत आहे. बांगलादेश गंगा नदीचा करार पूर्ण होण्यापूर्वीच पाकिस्तान आणि चीनचा हात पकडताना दिसत आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालमधील भारत आणि बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात अनेक ठिकाणी तणाव दिसत आहे. भारताने बांगलादेश बॉर्डरवर सुरक्षा अधिक मजबूत केली. त्यामध्येच हा तणाव बॉर्डरवर असताना आता अजून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्याने भारतात मोठी खळबळ उडाली. सीमेवर रात्री झिरो पॉईंट येथे अडकलेले तब्बल 40 बांगलादेशी नागरिक अचानक बेपत्ता झाले. हे लोक अचानक बेपत्ता झाल्याने तणाव अधिकच वाढला.

कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज भागातील पानिशाला परिसरात पिलर क्रमांक 134 जवळ सर्वाधिक तणाव दिसून आला. सीमेवरील झिरो पॉईंटवर दहा जण अडकले होते. भारताने त्यांना बेकायदेशीरपणे परत पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा बांगलादेशने केला. बीजीबीने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. भारतानेही त्यांना परत पाठवले.

बीएसएफने हा प्रश्न सोडवण्यासाठी ध्वज बैठकीचा प्रस्ताव दिला, पण त्यालाही बांगलादेशने नकार दिला. शनिवारी पहाटे तणावानंतर जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर जवान बांगलादेशी हद्दीत परतले. कूचबिहारमधील, शितलकुची, जलपाईगुडी आणि दिनहाटा येथे तणाव बघायला मिळाला. या भागात महिला आणि मुलांसह 30 बांगलादेशी सीमेवर अडकले होते.

शुक्रवारी रात्रीपर्यंत हे लोक सीमेवरच अडकून पडली होती. मात्र, शनिवारी सकाळी हे सर्वजण अचानक बेपत्ता झाले. एकून 40 जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अखेर हे 40 जण बांगलादेशात गेले की, परत भारतात आले, याबाबत चर्चा सुरू आहे. बांगलादेश त्यांना घेण्यास नकार देत होता. ज्यामुळे आता सीमेवर पुन्हा एकदा तणाव बघायला मिळत आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. बांगलादेशी नाहरिकांना त्यांच्या देशात पाठवले जात आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात