AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, मोठा हाहाकार, बीएसएफने तब्बल..

India-Bangladesh Border News : भारत आणि बांगलादेश सीमेवर धक्कादायक घटना घडलीये. मोठा तणाव बघायला मिळत आहे. अंधाराचा फायदा घेऊन मोठी कारवाया सीमेवर सुरू होत्या. त्यानंतर बीएसएफ अॅक्शन मोडवर आली. भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे.

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, मोठा हाहाकार, बीएसएफने तब्बल..
India Bangladesh border
| Updated on: May 10, 2026 | 8:16 AM
Share

मागील काही दिवसांच्या तुलनेत भारत आणि बांगलादेशचे संबंध सध्या स्थिर आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात होते. हेच नाही तर हिंदूंवर मोठे अत्याचार बांगलादेशमध्ये होत होते. भारतीय दूतावासावरही मोठा हल्ला करण्यात आला. यादरम्यानच आता भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्याने एकच खळबळ उडालीये. भारत आणि बांगलादेशाची सीमा नद्यांनी, जंगलांनी आणि पर्वतांनी जोडलेली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा भागांवर लक्ष ठेवणे म्हणजे मोठे आव्हान आहे. बीएसएफकडून 24 तास डोळ्यात तेल ओतून सुरक्षा केली जाते. अतिक्रमण आणि अवैध कारवायांवर बीएसएफचे बारीक लक्ष असते. त्यामध्येच बांगलादेशची सीमा तस्करी आणि घुसखोरीसाठी ओळखली जाते. मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न कायमच बांगलादेशातून होतो.

मिळालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री त्रिपुराच्या सेपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि तस्करांमध्ये मोठी चकमक झाली. काही काळ सीमेवर तणावाचे वातावरण होते. या चकमकीत दोन बांगलादेशी नागरिक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बीएसएफने मोठा दावा केला. बीएसएफने स्पष्ट सांगितले की, जवानांनी त्यांच्या आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला.

ही घटना कमलासागर सीमा चौकीजवळ घडली. हा भाग तस्करी कारवायांसाठी संवेदनशील आहे. भारतात मोठ्या प्रमाणात याच भागातून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जातो. बीएसएफच्या एका गस्ती पथकाने रात्री उशिरा सीमेवरील कुंपणावरून माल वाहून नेणाऱ्या सुमारे 10 ते 15 लोकांच्या गटाला पाहिले. त्यानंतर लगेचच बीएसएफकडून कारवाई करण्यात आली. दोन्ही बाजूने जोरदार चकमक झाली.

भारतीय सैनिकांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, बीएसएफवर तस्करांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. बीएसएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोळीबाराला सुरूवात झाली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बीएसएफकडून अगोदरच या घटनेवर स्पष्टीकरण देण्यात आले. बीएसएफ जवानांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. मृतांची ओळख 20 वर्षीय नवीन हुसेन आणि 40 वर्षीय मोहम्मद मुरसलीन अशी पटली आहे.

Follow Us
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
.....म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....