AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, मोठा हाहाकार, बीएसएफने तब्बल..

India-Bangladesh Border News : भारत आणि बांगलादेश सीमेवर धक्कादायक घटना घडलीये. मोठा तणाव बघायला मिळत आहे. अंधाराचा फायदा घेऊन मोठी कारवाया सीमेवर सुरू होत्या. त्यानंतर बीएसएफ अॅक्शन मोडवर आली. भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे.

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, मोठा हाहाकार, बीएसएफने तब्बल..
India Bangladesh border
| Updated on: May 10, 2026 | 8:16 AM
Share

मागील काही दिवसांच्या तुलनेत भारत आणि बांगलादेशचे संबंध सध्या स्थिर आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात होते. हेच नाही तर हिंदूंवर मोठे अत्याचार बांगलादेशमध्ये होत होते. भारतीय दूतावासावरही मोठा हल्ला करण्यात आला. यादरम्यानच आता भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्याने एकच खळबळ उडालीये. भारत आणि बांगलादेशाची सीमा नद्यांनी, जंगलांनी आणि पर्वतांनी जोडलेली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा भागांवर लक्ष ठेवणे म्हणजे मोठे आव्हान आहे. बीएसएफकडून 24 तास डोळ्यात तेल ओतून सुरक्षा केली जाते. अतिक्रमण आणि अवैध कारवायांवर बीएसएफचे बारीक लक्ष असते. त्यामध्येच बांगलादेशची सीमा तस्करी आणि घुसखोरीसाठी ओळखली जाते. मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न कायमच बांगलादेशातून होतो.

मिळालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री त्रिपुराच्या सेपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि तस्करांमध्ये मोठी चकमक झाली. काही काळ सीमेवर तणावाचे वातावरण होते. या चकमकीत दोन बांगलादेशी नागरिक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बीएसएफने मोठा दावा केला. बीएसएफने स्पष्ट सांगितले की, जवानांनी त्यांच्या आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला.

ही घटना कमलासागर सीमा चौकीजवळ घडली. हा भाग तस्करी कारवायांसाठी संवेदनशील आहे. भारतात मोठ्या प्रमाणात याच भागातून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जातो. बीएसएफच्या एका गस्ती पथकाने रात्री उशिरा सीमेवरील कुंपणावरून माल वाहून नेणाऱ्या सुमारे 10 ते 15 लोकांच्या गटाला पाहिले. त्यानंतर लगेचच बीएसएफकडून कारवाई करण्यात आली. दोन्ही बाजूने जोरदार चकमक झाली.

भारतीय सैनिकांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, बीएसएफवर तस्करांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. बीएसएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोळीबाराला सुरूवात झाली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बीएसएफकडून अगोदरच या घटनेवर स्पष्टीकरण देण्यात आले. बीएसएफ जवानांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. मृतांची ओळख 20 वर्षीय नवीन हुसेन आणि 40 वर्षीय मोहम्मद मुरसलीन अशी पटली आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत