AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या काळात भारत तेल-गॅस संकटाचा सामना कसा करणार? PM मोदींनी संसदेत सांगितला प्लॅन

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी भारताची योजना काय आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

युद्धाच्या काळात भारत तेल-गॅस संकटाचा सामना कसा करणार? PM मोदींनी संसदेत सांगितला प्लॅन
Modi on LPGImage Credit source: Google
| Updated on: Mar 23, 2026 | 3:30 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. भारतावरही या युद्धाचा परिणाम झाला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी देशातील जनतेचे हित सुरक्षित राहील, असा विश्वास दिला आणि सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संयमाने परिस्थितीचा सामना करण्याची गरज असल्याचेही म्हटले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

LPG उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण कोरोना काळात तयारीत होतो आणि त्याचा फायदा झाला. त्याचप्रमाणे आता देखील धैर्य आणि संयम ठेवून प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची गरज आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खत होर्मुज सामुद्रधुनीमार्गे येतात. युद्धानंतर जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा फारसा बाधित होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 60 टक्के एलपीजी आयात करतो. पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याने सरकारने घरगुती वापराला प्राधान्य दिले असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठीही उपाय योजना केल्या जात आहेत.

भारतात किती तेलसाठा?

भारतातील तेलसाठ्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, गेल्या दशकात ऊर्जा सुरक्षिततेसाठी घेतलेली पावले आता अधिक महत्त्वाची ठरत आहेत. भारताने ऊर्जा आयात विविध देशांमधून करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी 27 देशांमधून होणारी आयात आता 41 देशांपर्यंत वाढवली आहे. भारताकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन तेलसाठा आहे आणि तो 65 लाखांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कंपन्यांकडेही वेगळे साठे आहेत. आम्ही विविध देशांशी संपर्कात असून पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खाडी आणि आसपासच्या समुद्री मार्गांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. जहाजांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर आहोत.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार तत्पर

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘युद्ध सुरू झाल्यापासून या भागातील भारतीयांना मदत करण्याचे काम सुरु आहे. मी संबंदित देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललेलो आहे. काही लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आम्ही शक्य ती मदत देत आहोत. भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. युद्धाच्या काळात 3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले आहे. तसेच इराणमधून 1000 लोक मायदेशी परतले आहेत. सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे.’

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.