राजधानीतील तो अशुभ बंगला,कोणत्याच CM ला फळला नाही,आता त्याचे नशीब बदलणार ?
अनेक जण म्हणतात की एखाद्या इमारतीने कोणाचे भाग्य निश्चित होत नाही. परंतू भारतीय राजकारणात अनेक प्रतीके आणि मान्यतेचा परिणाम पाहायला मिळत आला आहे.

दिल्लीच्या राजकारणाची संस्कृती देशातील इतर राज्याहून भिन्न आहे. येथील सरकारी बंगल्यात प्रशस्थ लॉन असते आणि बंगल्यात राहणाऱ्यांचा थाट एखाद्या राजाप्रमाणे असतो. मात्र, दिल्लीत एका अशुभ बंगल्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल..राजधानीच्या सिव्हील लाईन्स स्थित ३३ शमनाथ मार्गावरील या सरकारी बंगल्याला दशकाहून अधिक काळ शापित मानले गेले आहे. परंतू आता या ७० वर्षे जुन्या बंगल्याला नवा मालक मिळणार आहे. या रहस्यमयी बंगल्याच्या कहाणीत आता कलाटणी मिळणार आहे.
33 शमनाथ मार्गावरील हा बंगला दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्म प्रकाश यांचे अधिकृत निवास बनले होते. त्यानंतर जे जे मुख्यमंत्री त्या निवासस्थानी राहिले त्यांचा मुख्य कार्यकाल काही ना काही कारणांनी पूर्ण झाला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या बंगल्यास शापित ठरवण्यात आले. कारण हा बंगला कोणत्याही मुख्यमंत्र्याला भावला नाही.
आता कोण बनणार या बंगल्याचा मालक ?
दिल्ली सरकारने या बंगल्याला मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान म्हणून वापर करण्याच्या ऐवजी याला नव्या उद्देश्यासाठी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बातम्यानुसार सरकारने येथे राज्य आपात्कालिन व्यवस्थापन संबंधित आधुनिक कार्यालय आणि कमांड सेंटर बनवण्याची तयारी केली आहे.यासाठी ब्रिटीशकालीन या इमारतीला नष्ट करण्याचा विचार केला जात आहे. म्हणजे आता यास मुख्यमंत्री निवास नव्हे तर आपात्कालिन व्यवस्थापन व्यवस्थेचे नवीन केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटीश काळाचा वारसा
हा ब्रिटीश काळाचा वारसा असलेला हा बंगला १९२० च्या दशकात तयार केला होता. दोन मजल्याच्या या विशाल बंगल्यात चार बेडरुम, ड्राईंग रुम, मोठे लॉन, फवारे आणि स्टाफ क्वॉर्टर सारख्या सुविधा आहेत. दिल्ली विधानसभेच्या जवळ असल्याने हा बंगला मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान म्हणून उपयोगी मानला जात होता. परंतू अंधविश्वास आणि राजकारणातील योगायोगाने या बंगल्याची पार रया गेली. अशात आता या बंगल्याला आता प्रशासकीय केंद्र म्हणून नवीन ओळख मिळाली तर पुढे कदाचित या बंगल्याची अशुभ असल्याची छबी कदाचित दूर होईल.