AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : नद्या नाले भरणार, धरणंही तुडूंब होणार, या दिवसापासून राज्यात तुफान पाऊस, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला!

दुष्काळ वगैरे काहीही पडणार नाही. शेतकऱ्यांनी भीती बाळगू नका. 19 जूनच्या नंतर उन्हाची तीव्रताही कमी होणार आहे. ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Monsoon Update : नद्या नाले भरणार, धरणंही तुडूंब होणार, या दिवसापासून राज्यात तुफान पाऊस, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला!
monsoon rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 8:30 PM
Share

Monsoon Update : राज्यात यंदा पाऊस कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाने अजूनही संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात अजूनही पेरणी केलेली नाही. दरम्यान, आता हवामानाची माहिती देणारे पंजाबराव डख यांनी आगामी काळात पावसाची स्थिती कशी असेल, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पाऊस नेमका कसा असेल? शेतकऱ्यांना परेणी कधी करता येईल, याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.

यंदाचे वर्ष सर्वात चांगले राहणार

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. परंतु आता मान्सून स्थिरावला आहे. अशी स्थिती दरवर्षी पाऊस पडल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात असते. म्हणूनच शेतकऱ्यांना वाटत आहे की यावर्षी पाऊस पडणार नाही. दुष्काळ पडणार आहे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. परंतु शेतकऱ्यांना मी सांगतो की यंदाचे वर्ष सर्वात चांगले राहणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला म्हणजेच पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार

तसेच, सर्वांच्या हळूहळू पेरण्या चालू होतील. या वर्षाच्या जून महिन्यात पाऊस कमी पडेल. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी असेल. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. परंतु दुष्काळ वगैरे काहीही पडणार नाही. यंदाचे साल हे शेतकरी हिताचे आहे. शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यात कुठे आणि कधी पाऊस होईल?

राज्यात 18 जूनच्या नंतर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 20 ते 21 जूनच्या दरम्यान हा पाऊस मराठवाड्यात येईल. मराठवाड्यात 21 ते 29 जूनच्या काळात वेगवेगळ्या भागात पाऊस होईल. विदर्भात 18 ते 19 जूनपासूनच पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर तिथेही पेरण्या सुरू होतील. त्यानंतर हा पाऊस उत्तर उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. उत्तर महाराष्ट्रात 23 जून ते 29 जूनच्या दरम्यान पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रातही 23 जून ते 29 जूनच्या काळात पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

दुष्काळ पडणार नाही

दुष्काळ वगैरे काहीही पडणार नाही. शेतकऱ्यांनी भीती बाळगू नका. 19 जूनच्या नंतर उन्हाची तीव्रताही कमी होणार आहे. ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!