AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agnipath Scheme : अग्निपथ होणार सुरू; सेनाप्रमुखांनीच सांगितला प्लॅन कधी करणार योजनेला प्रारंभ

अग्निवीरांची भरती येत्या 90 दिवसांत सुरू होणार असून जुलै 2023 पर्यंत पहिली तुकडी तयार होईल, अशी माहिती आहे.

Agnipath Scheme : अग्निपथ होणार सुरू; सेनाप्रमुखांनीच सांगितला प्लॅन कधी करणार योजनेला प्रारंभ
अग्निपथ योजनाImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 17, 2022 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) आनलेल्या अग्निपथ योजनेला देशात मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यात या योजनेवरून तरूणांच्यामध्ये संतोष दिसत असून तरूण हे रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. तर काही ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळन लागले. ज्यात तरूणांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या तर काही ठिकाणी टायर पेटवून रस्त्यावर चक्काजाम केला. त्यानंतर आता अग्निपथ योजनेवरून (Agneepath Yojana) एक बातमी समोर येत असून या बातमीत योजनेची तारिखच सांगण्यात आली आहे. तर लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pandey) यांनी शुक्रवारी सांगितलं की, अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे ट्रेनिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. तर पुढच्या दोन दिवसांत त्याबाबत विविध वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यानंतर आमचे लष्कर भरती घेणारी टीम ही याबाबत निर्णय घेईल आणि त्याची घोषणा करेल. तर अग्निवीरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना संबंधीत भर्ती ट्रेनिंग सेंटरांवर जावं लागेल. तर पहिल्या बॅचचे ट्रेनिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरू होईल. तर प्रत्यक्ष सेवा ही 2023 मध्ये.

कोरोनाच्या कारणाने गेल्या दोन वर्षांपासून सैन्यात तरुणांची भरती थांबली आहे. लष्कराने 2019-2020 मध्ये सैनिकांची भरती केली होती. तेव्हापासून सैन्यात सैनिकांची भरती झालेली नाही. दुसरीकडे, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलात गेल्या दोन वर्षांत सैनिकांची भरती झाली आहे. केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी बिहारमध्ये हिंसक निदर्शने झाली. शेकडो तरुणांनी रेल्वे आणि रस्ता रोको केला. त्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने

बुधवारी मुझफ्फरपूर, बेगुसराय आणि बक्सर जिल्ह्यात युवकांनी या योजनेला विरोध केला. त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखून धरली. अग्निवीरांची भरती येत्या 90 दिवसांत सुरू होणार असून जुलै 2023 पर्यंत पहिली तुकडी तयार होईल, अशी माहिती आहे. “अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना सरकारने इतर नोकऱ्यांमध्ये 20-30 टक्के आरक्षण द्यावे,” असे एका आंदोलकाने सांगितले. सशस्त्र दलातील भरती प्रक्रियेत बदल करण्याच्या उद्देशाने अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र विरोधकही याला मोठा विरोध करत आहेत. मात्र, सरकारने अग्निवीरांच्या कमाल वयोमर्यादेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता 17.5 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंतच्या तरूणांना या योजनेत सहभागी होता येईल. तर सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमिवर यात बदल करण्यात आला असून आता वयोमर्यादा वाढविण्यात आला आहे. आता ही वयोमर्यादा 23 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. तर नोकरीच्या पहिल्या वर्षी 4.76 लाख रूपयांचे पॅकेज मिळणार आहे. जे चौथ्या वर्षांपर्यंत 6.92 लाख रूपयांपर्यंत तो जाईल.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!