AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये शिरताच सर्वातआधी बेडच्या खाली रिकामी पाण्याची बाटली का टाकावी? तुम्हलाही माहिती नसेल या मागचं खरं कारण

आपण जेव्हा बाहेरगावी प्रवास करतो, विषेत: जिथे आपल्या ओळखीचं कोणीच नसतं, अशा ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला हॉटेलशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. मात्र आपण मुक्कामासाठी जी हॉटेल निवडतो ती नवी असल्यामुळे आपल्या मनात अनेक शंका असतात.

हॉटेलमध्ये शिरताच सर्वातआधी बेडच्या खाली रिकामी पाण्याची बाटली का टाकावी? तुम्हलाही माहिती नसेल या मागचं खरं कारण
हॉटेलमध्ये बेडखाली रिकामी पाण्याची बाटली का टाकावी?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 7:01 PM
Share

अनेकदा आपण काही कामनिमित्त किंवा पर्यटनासाठी दुसऱ्या एखाद्या शहरात जात असतो. अशा प्रत्येक ठिकाणीच आपल्या कोणी ओळखीचं असेल किंवा आपले नातेवाईक असतील असं होत नाही, आणि जरी समजा नातेवाईक असले तरी देखील अनेकजण त्यांना आपला त्रास नको असा विचार करतात. त्यामुळे आपण जेव्हा आपलं घर सोडून बाहेर गावी फिरण्यासाठी जातो किंवा कामानिमित्त जातो तेव्हा तिथे आपल्या मुक्काची व्यवस्था म्हणून आपण एखाद्या चांगल्या हॉटेलची निवड करतो. हॉटेल कितीती चांगलं असलं, हॉटेल स्टाफकडून मिळणाऱ्या सुविधाही चांगल्या असल्या तरी असं हॉटेल आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असतं. त्यामुळे त्या हॉटेलच्या सुरक्षेसंदर्भात आपल्या मनात अनेक शंका उपस्थित होत असतात. अनेकदा आपण अशा ठिकाणी अस्वस्थ देखील होतो.

आपण जर यापूर्वी काहीवेळा त्या हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल तर मग गोष्ट वेगळी असते, आपल्याला तेथील सर्व वातावरणाची कल्पना असते.  परंतु अनेकजण असे असतात की ज्या शहरात जायचं आहे, त्या शहरात जाण्यापूर्वीच गैरसोय नको म्हणून आधीच ऑनलाईन हॉटेलची बुकिंग करतात. अशा स्थितीमध्ये तर चिंता अधिक वाढते, कारण आपण ती हॉटेल देखील पाहिलेली नसते. सर्वच गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात.

दरम्यान अनेक हॉटेमध्ये यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत, काही हॉटेलच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले जातात. यामुळे तुमच्यासोबत धोका होऊ शकतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये मुक्कामाला असता तेव्हा अधिक सतर्क राहणं गरजेचं असतं. याच संदर्भात एका एअर होस्टसने आपला अनुभव शेअर केला आहे.

एअर होस्टसने केवळ आपला अनुभवच शेअर केला नाही तर हॉटेलमध्ये जे लोक मुक्काम करतात त्यांना सल्ला देखील दिला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये प्रवेश करतात तेव्हा रूममध्ये प्रवेश करताच सर्वात आधी बेडच्या खाली रिकामी पाण्याची बाटली टाका असं या एअर होस्टसेने सांगितलं आहे. तिने त्यामागचं कारण देखील सांगितलं आहे. ती म्हणते की समजा तुम्ही तुमच्या बेडखाली रीकामी बाटली फेकली आणि ती जशीच्या तशी दुसऱ्या बाजुने बाहेर आली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या बेडखाली कोणी लपलेलं नाहीये, मात्र जर बाटली बाहेर आली नाही  तर मात्र मग चिंता करण्याचं कारण असू शकतं, असं या एअर होस्टसने म्हटलं आहे. तसेच तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये शिरता तेव्हा पहिल्यांदा तुमच्या बेडरूमध्ये लावण्यात आलेले सर्व आरसे नीट चेक करा असा सल्लाही या एअर होस्टेसने दिला आहे. कारण अशा ठिकाणीच छुपे कॅमेरे असल्याची जास्त शक्यता असते, असंही तिने म्हटलं आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.