AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणाची पाकिट घेण्यासाठी थांबले, पण १५ जणांच्या आयुष्यातील शेवटचे जेवण ठरले

परतणाऱ्या लोकांसाठी मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. तीन बसेस त्यासाठी थांबल्या होत्या.

जेवणाची पाकिट घेण्यासाठी थांबले, पण १५ जणांच्या आयुष्यातील शेवटचे जेवण ठरले
| Updated on: Feb 25, 2023 | 10:59 AM
Share

भोपाळ : शबरी मातेच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील सतनामध्ये कोल समाजाचा महाकुंभ 24 फेब्रुवारी रोजी (Kol Samaj Sammelan)आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah), मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (shivraj singh chouhan) सहभागी झाले होते. या महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक आले होते. कार्यक्रम आटोपून अनेक जण आपल्या गावाकडे परत निघाले. परतणाऱ्या लोकांसाठी मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. तीन बसेस त्यासाठी थांबल्या होत्या. परंतु ही जेवणाची पाकिटे त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली.

ट्रकने धडक दिली तेव्हा काही प्रवाशी जेवणाची पाकिटे घेऊन बसमध्ये बसली होती. परंतु या तीन बसेसला ट्रकने धडक दिल्यामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाला.

रीवा आणि सतना जिल्ह्यांच्या सीमेवर शुक्रवारी रात्री उभ्या असलेल्या या बसेसवर एका सिमेंटच्या ट्रक आदळला. त्या ट्रकने तीन बसेसला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृ्त्यू झाला. अपघातातील दहा मृतांची ओळख पटली आहे. इतर पाच जणांची ओळख अजून पटलेली नाही.या अपघातात जखमी झालेल्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. बरखडा गावाजवळील बोगद्याच्या बाहेर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे.

महाकुंभात गेले होते

सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होऊन या बसेस परतत येत होत्या. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील सहभागी झाले होते. सीएम शिवराज सिधीमध्ये होते. माहिती मिळताच त्यांनी बडखरा गाव गाठले.

दोन बसेस दरीत कोसळल्या

रात्री ९ वाजता मोहनिया बोगद्यापासून काही अंतरावर हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन बस 10 फूट खोल दरीत कोसळल्या. महामार्गावरच एक बस उलटली. ट्रक सिमेंटने भरलेला होता, धडकेनंतर उलटला.

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह सिधी आणि रीवा जिल्ह्याचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि दोन्ही बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेश युनिटचे अध्यक्ष विष्णू दत्त शर्मा हे देखील सतना येथून घटनास्थळी पोहोचले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.