AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंतांना गटवायची, फॅशन डिझायनरचं कातिलाना सौंदर्य आणि तो खेळ… वाचून धक्काच बसेल

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक महिला श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे, सोने आणि कार लुटायची. याबाबत पोलिसांना महिती मिळताच त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

श्रीमंतांना गटवायची, फॅशन डिझायनरचं कातिलाना सौंदर्य आणि तो खेळ... वाचून धक्काच बसेल
क्राईमImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 10, 2026 | 7:29 PM
Share

सोशल मीडियाचा वापर करून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे, सोने आणि कार लुटल्याच्या आरोपावरून एका फॅशन डिझायनर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपा अवतागी नावाची ही महिला सोशल मीडियावर श्रीमंत पुरुषांशी ओळख करून त्यांच्याशी जवळीक वाढवत असे. त्यानंतर ती त्यांना लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे. भेटीनंतर ती अतिशय चलाखीने त्यांच्या जवळील पैसे, सोने किंवा कार घेऊन फरार होत असल्याचा आरोप आहे.

कर्नाटकातील बेलगावी येथील हे धक्कादायक प्रकरण आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की हे संपूर्ण प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. दीपा अवतागीला या प्रकरणात अटक करण्यात आली असून तिचा एक साथीदार अजूनही फरार आहे. सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशी सुरू व्हायची फसवणुकीची खेळी

कर्नाटकातील बेलगावी येथे उघडकीस आलेल्या या हनीट्रॅपसारख्या फसवणूक प्रकरणाने पोलिसांनाही आश्चर्यचकित केले आहे. तिलकवाडी पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी 33 वर्षीय दीपा अवतागीला अटक केली आहे. ती मूळची महालिंगपूर (जिल्हा बागलकोट) येथील रहिवासी असून व्यवसायाने फॅशन डिझायनर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ती Instagram आणि Facebook सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर श्रीमंत आणि प्रभावशाली पुरुषांना लक्ष्य करत असे. सुरुवातीला ती त्यांच्याशी मैत्री करत असे आणि हळूहळू त्यांचा विश्वास जिंकत असे. नंतर हाच विश्वास तिच्या फसवणुकीचा मुख्य मार्ग ठरत होता.

श्रीमंत पुरुषांनाच बनवत होती शिकार

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दीपा विशेषतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पुरुषांनाच शिकार करत होती. ती सोशल मीडियावर संवाद सुरू करून स्वतःला अतिशय विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण स्वभावाची असल्याप्रमाणे सादर करत होती. संवाद हळूहळू वाढत जाई आणि समोरचा व्यक्ती तिच्यावर विश्वास ठेवू लागे. काही दिवसांतच बोलणे इतके वाढत असे की तो व्यक्ती तिला प्रत्यक्ष भेटण्यास तयार होई. त्यानंतर ती भेटीचा प्रस्ताव ठेवत असे आणि एखाद्या लॉज किंवा हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे. अशा प्रकारे ती अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याचे तपासात समोर आले असून, आतापर्यंत अनेक जण तिच्या या फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

लॉजमध्ये बोलावून रचत होती डाव

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती तिच्या भेटीसाठी लॉजमध्ये पोहोचल्यानंतर ती सुरुवातीला अगदी सामान्यपणे संवाद साधत असे आणि त्यांचा विश्वास अधिक मजबूत करत असे. त्यानंतर एखाद्या बहाण्याने ती त्या व्यक्तीला आंघोळ करण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाण्यास सांगत असे. जसेच तो व्यक्ती बाथरूममध्ये जात असे, तसेच ती खोलीत ठेवलेले रोख पैसे, सोने, बॅग आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जात असे. काही प्रकरणांमध्ये तर ती पीडितांची कार घेऊनही फरार झाल्याचे समोर आले आहे. पीडित व्यक्तीला संपूर्ण प्रकार समजण्यापर्यंत ती खूप दूर निघून गेलेली असायची. त्यामुळे अनेक जण या फसवणुकीचे बळी ठरले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.