AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिशन बंगाल’, झारखंडचे तीन माजी मुख्यमंत्री मैदानात; वाचा भाजपचा संपूर्ण प्लान

पश्चिम बंगालमधील अनेक नेते, अभिनेते, खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. (Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

'मिशन बंगाल', झारखंडचे तीन माजी मुख्यमंत्री मैदानात; वाचा भाजपचा संपूर्ण प्लान
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 21, 2021 | 8:50 AM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालमधील अनेक नेते, अभिनेते, खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण जोर लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बंगाल सर करण्यासाठी भाजपने कोणतीही कसूर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून झारखंडच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनाही बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. (Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तारखा घोषित व्हायच्या आहेत. मात्र, भाजपने त्यापूर्वीच बंगालमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. दिल्लीपासून अन्य राज्यातील भाजपचे नेतेही बंगालचा दौरा करत आहेत. त्यामुळे भाजपने आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांना बंगालच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंडा हे बांगला भाषिक राज्यातूनच येतात. त्यामुळे ते आधीच बंगालमध्ये दाखल झाले आहेत. तर बाबूलाल मरांडी आणि रघुबर दास हे दोन माजी मुख्यमंत्रीही लवकरच बंगालमध्ये पोहोचणार आहेत. हो दोन्ही नेते लवकरच बंगालमध्ये प्रचार करताना दिसणार आहे. मरांडी यांनी आधीच बंगालचा दौरा करून संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता त्यांचा बंगालमधील पुढील प्रचाराचा संपूर्ण कार्यक्रम तयार होणार आहे.

झारखंड-पश्चिम बंगालच्या सीमा एकच

बंगालची अनेक गावं झारखंडच्या सीमेवर आहेत. रांची जिल्ह्याची सीमा पुरलिया जिल्ह्याला लागूनच आहे. तर वर्धमानची सीमा धनबादला लागून आहे. झारखंडच्या धनबादमध्ये निरसा आणि अन्य काही ठिकाणी भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. झारखंडचे जमशेदपूर क्षेत्रही बंगालच्या जवळच आहे. माजी मुख्यमंत्री रघूबर दास स्वत: जमशेदपूरचे आहेत.

रणनीती यशस्वी होणार?

झारखंडच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना बंगालच्या निवडणुकीच्या मैदानात उतवरण्याचा भाजपने ठरवून निर्णय घेतला आहे. मात्र, प्रचाराचा धुरळा उठल्यावरच भाजपची ही रणनीती किती यशस्वी झाली हे दिसून येईल. बंगालमध्ये सध्या प्रचंड राजकीय शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी बंगालच्या निवडणुकीसाठी बंगालमध्ये तळ ठोकला आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत अनेक नेत्यांनी बंगालचे वारंवार दौरे केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही बंगालमध्ये येऊन गेले असून त्यांचे आणखीही दौरे होणार आहेत. त्यामुळे बंगाल कुणाच्या हाती जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

संबंधित बातम्या:

Delhi Violence : लाल किल्ल्यावरील हिंसाचारात सहभागी 20 जणांचे फोटो प्रसिद्ध, दिल्ली पोलिसांकडून शोधमोहीम हाती

VIDEO: पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणं पुन्हा महागात, कॉमेडियन श्याम रंगीला विरोधात तक्रार दाखल

तेव्हा तो दिवस ‘अच्छा दिन’ म्हणून जाहीर करा; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका

(Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.