AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या महिन्यापासून तीन पद्धतीच्या वंदेभारत धावणार, रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण

जूनमध्यापर्यंत देशातील प्रत्येक राज्याला वंदेभारत एक्सप्रेस मिळणार आहे, वंदेभारतच्या निर्मितीचा वेग आता प्रचंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हे शक्य होणार आहे.

या महिन्यापासून तीन पद्धतीच्या वंदेभारत धावणार, रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Vande_Bharat_ExpressImage Credit source: socialmedia
| Updated on: May 26, 2023 | 12:37 PM
Share

मुंबई : आलिशान आणि वेगवान वंदेभारत एक्सप्रेसच्या तीन आवृत्तींचा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून प्रवाशांना आनंद घेता येईल असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलिकडेच पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे. या तीन प्रकारात वंदेभारत चेअरकार, वंदेभारत मेट्रो आणि वंदेभारत स्लिपर यांचा समावेश आहे. या तीन स्वदेशी सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन शताब्दी, राजधानी आणि लोकल ट्रेनच्या जागी चालविल्या जातील असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तीन ते चार वर्षांत रेल्वे रुळांची क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण होईल त्यामुळे वंदेभारत तिच्या कमाल 160 किमी वेगाने चालविणे शक्य होईल. वंदेभारतचे तीन फॉरमॅट येणार आहेत. शंभर किमीपेक्षा अंतरावर वंदेभारत मेट्रो चालविण्यात येईल, 100 – 550 किलोमीटरच्या टप्प्यात वंदेभारतचे चेअरकार चालविण्यात येईल तर 550 किलोमीटरच्या पुढच्या अंतरासाठी वंदेभारत स्लिपर कोच चालविली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नुकतीच दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे टर्मिनलहून उत्तराखंडच्या डेहराडून येथे वंदेभारत सुरू करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली ते डेहराडून वंदेभारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच हिरवा झेंडा दाखविला. शताब्दी एक्सप्रेसला देशाची राजधानी दिल्ली ते उत्तराखंडची राजधानी डेहराडून प्रवासासाठी सहा तास दहा मिनिटे लागत होती. तोच प्रवास आता वंदेभारत एक्सप्रेसने साडेचार तासांत होणार आहे.

दर आठ ते नऊ दिवसांनी नवी वंदेभारत

जूनमध्यापर्यंत देशातील प्रत्येक राज्याला वंदेभारत एक्सप्रेस मिळणार आहे, वंदेभारतच्या निर्मितीचा वेग आता प्रचंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हे शक्य होणार आहे. दर आठव्या किंवा नवव्या दिवशी नवीन वंदेभारत फॅक्टरी बाहेर पडत आहे. दोन नवीन फॅक्टरी स्थापन करण्याचे काम सुरू असून एकदा सप्लाय चेन स्टॅबिलायझ होईल तेव्हा या कारखान्यातूनही वंदेभारत बाहेर पडेल असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.

सीमाभागात 4G आणि 5G चे नेटवर्कचे जाळे

वंदेभारतचा वेग दर ताशी 160 किमी असली तरी रूळांच्या क्षमतेअभावी त्या ताशी 130 किमीच्या वेगाने चालविण्यात येत आहेत. जुने रेल्वे ट्रॅक केवळ प्रति तास 70 ते 80 किमी वेगाने ट्रेन चालविण्याच्या क्षमतेचे आहेत. 35,000 किमीचा रेल्वे ट्र्रॅकची क्षमता प्रति तास 110 किमी, 130 किमी आणि 160 किमी वेगाचे करण्याच काम सुरू असून त्याला तीन ते चार वर्षे लागतील अशी माहिती रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिली आहे. सीमाभागात वंदेभारतचे जाळे पसविताना प्रवाशांना 4G आणि 5G चे नेटवर्क मिळावे यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याचे कामही रेल्वे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या! पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीआधीच
दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या! शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला