AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Biplab Kumar Deb resigns : भाजपची खांदेपालटाची परंपरा त्रिपुरातही कायम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देव यांचा राजीनामा

राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्यपालांकडे देव यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मात्र निवडणुका जवळ आल्या असताना हा निर्णय घेतल्याने राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

Biplab Kumar Deb resigns : भाजपची खांदेपालटाची परंपरा त्रिपुरातही कायम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देव यांचा राजीनामा
भाजपची खांदेपालटाची परंपरा त्रिपुरातही कायम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देव यांचा राजीनामाImage Credit source: tv9
| Updated on: May 14, 2022 | 4:48 PM
Share

नवी दिल्ली : त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री विप्लव देव (Biplab Kumar Deb resigns) यांनी राजीनामा दिला आहे. 8 महिन्यांनंतर राज्यात निवडणुका होणार आहेत. देव हे चार वर्षांपासून राज्याचे नेतृत्व करत होते. भाजपा, इंडिजिनस पीपुल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या सरकारचा चार वर्षांचा कारभार त्यांनी केला. राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्यपालांकडे देव यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. राज्यात आठ महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजपाने केलेला दिसतोय. 2023च्या निवडणुकांपूर्वी (Tripura Elecitons) हा मोठा निर्णय मानण्यात येतो आहे. विप्लव देव यांची शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी भेट झाली होती. दरम्यान केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे अगरतलाला पोहचले आहेत. राज्यातील आमदारांची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे, त्या बैठकीत ते सहभागी होतील. याच बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाववर शिक्कामोर्तब होणार आहे.

राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी सर्वोपरि आहे. हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी आपले पद सोडले. नवा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

राजीनाम्याचे कारण काय असू शकते?

बिप्लव देव यांच्याबाबत पक्ष संघटनेत नाराजी आहे. दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेतील कोणतेही पद स्वीकारू शकतात.

विनोद तावडे यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती

महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका पार पडणार असल्यामुळे आता तावडे त्रिपुराची कमान कशी संभाळणार? याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत. मात्र भाजप नेते विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीटही देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता त्यांच्यावर त्रिपुरात मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.