AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today: देश प्रवचन, कीर्तनांनी सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही; गडकरी म्हणतात, प्रदूषित राजकारण नकोच

What India Thinks Today: केंद्र सरकारची अग्निपथ योजना चांगली आहे. फक्त ती समजून घेतली पाहिजे. लोकांना या योजनेची जशी माहिती मिळेल तसा विरोध संपुष्टात येईल, असं त्यांनी सांगितलं.

What India Thinks Today: देश प्रवचन, कीर्तनांनी सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही; गडकरी म्हणतात, प्रदूषित राजकारण नकोच
गडकरी म्हणतात, प्रदूषित राजकारण नकोचImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2022 | 5:16 PM
Share

What India Thinks Today Global Summit: टीव्ही9 ने ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं (What India Thinks Today Global Summit) आयोजन केलं आहे. देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या परिषदेत भाग घेऊन आजचा दिवस गाजवला. गडकरी यांनी अग्निपथ (agnipath) योजनेपासून ते राष्ट्रपती निवडणुकीवर भाष्य केलं. तसेच त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेवरही त्यांनी भाष्य केलं. मला प्रदूषित राजकारणात जायचं नाही. त्यावर मला बोलायचंही नाही. हा देश कधी प्रवचन आणि कीर्तनांनी सुधारला नाही आणि तमाशाने कधी बिघडला नाही, असं रोखठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढली असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आजकाल इलेक्ट्रिक वाहने वेटिंगवर मिळत आहे. त्यामुळे गाडी खरेदी करायचीच असेल तर इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

नितीन गडकरी यांनी टीव्ही9 ने ग्लोबल समिट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये हे विधान केलं. तुमच्या पक्षाच्यावतीने वातावरण खराब केलं जात आहे, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ते बोलत होते. मी शुद्ध हवेत राहतो. मी प्रदूषित हवेत जात नाही. त्यामुळे प्रदूषित विधाने करत नाही. तुम्ही शुद्ध हवेत राहा, मीही राहतो. प्रदूषण करू नका. मला कोणी तरी सांगितलं दोन रेषा असतात. आपली रेषा मोठी करण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे दुसरी रेषा कमी करा किंवा दुसरा मार्ग म्हणजे आपली रेषा मोठी करा. मी नेहमी आपली रेषा मोठी करत असतो. पॉझिटिव्ह असतो. कोण काय बोलत आहे. कोण काय लिहित आहे. कोण काय पाहत आहे याकडे मी लक्ष देत नाही. ज्याचं त्याच्याकडे. आपलं काम करायचं ते करत राहा, असं गडकरी म्हणाले.

अग्निपथ योजना सर्वात चांगली

यावेळी त्यांनी अग्निपथ योजना चांगली असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारची अग्निपथ योजना चांगली आहे. फक्त ती समजून घेतली पाहिजे. लोकांना या योजनेची जशी माहिती मिळेल तसा विरोध संपुष्टात येईल, असं त्यांनी सांगितलं. भारतात लोकशाही आहे. जिथे लोकशाही असते. तिथे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असतात. सत्ताधारी जेव्हाही काही करतात तेव्हा विरोधक त्याला नकार देतात. लोकशाहीत हे सगळं चालतं. जनतेच्या न्यायालयात जो आम आदमी असतो तोच शेवटचा निर्णय घेत असतो, असं त्यांनी सांगितलं.

पक्ष अंतिम निर्णय घेईल

यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका योगदान यावर मोदी सरकारचा विश्वास आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह सर्वांशी चर्चा करत आहे. याबाबत संसदीय बोर्ड आणि पक्षाचा निर्णय अंतिम असेल, असंही त्यांनी सांगितलं.

समस्यांचं संधीत रुपांतर करा

आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीत समस्या कमी नसतात याचं मला नेहमीच स्मरण आहे. काही लोक समस्यांचं संधीत रुपांतर करतात. तर काही लोक संधीचंही समस्येत रुपांतर करतात. त्यामुळे अडचणी आल्यातर घाबरू नये, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?