AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्यातील MIDC आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

उरवडेतील क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयानंही मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केलीय. Prime Minister Office Two lakh help

पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्यातील MIDC आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
narendra modi
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 11:03 PM
Share

पुणेः पुण्याच्या मुळशीतील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडलीय. उरवडेतील क्लोरिफाईड कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयानंही मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केलीय. (Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister’s Office)

आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख

महाराष्ट्रातील पुणे येथील औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात आलीय, तर जखमींना 50,000 रुपये देणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलंय.

तर राज्य सरकारकडूनही मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. पुण्याच्या मुळशी येथील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत 15 महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुपारी दोनच्या दरम्यान आग लागल्याची माहिती

मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती. या केमिकल कंपनीत सकाळी 41 कर्मचारी कामासाठी आले होते. या 41 पैकी 17 लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी 15 महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

कंपनीमध्ये सॅनिटायझर निर्मिती

ही जी कंपनी आहे याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते. सकाळी 41 कामगार कामावर आले होते. आगीनंतर 17 जण बेपत्ता आहेत. यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

बंधित बातम्या: 

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

Two lakh assistance to the relatives of the deceased from the Prime Minister Office

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.