AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur Murder : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर कारमध्ये अत्याचार, हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकला

गँगरेप आणि हत्येनंतर महिलेचा मृतदेह आरोपींनी बस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विहिरीत टाकल्याचे सांगितले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींसह घटनास्थळी पोहोचले आणि तुंगा आणि बस्सी पोलीस ठाण्याच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Jaipur Murder : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर कारमध्ये अत्याचार, हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकला
बीडमध्ये बस स्थानकात संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 4:19 PM
Share

जयपूर : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर कारमध्ये गँगरेप करुन तिची हत्या (Murder) करत मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना जयपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात (Detained) घेतले आहे. मयत महिला 23 एप्रिल रोजी जगतपुराची रहिवासी असून दौसातील गोपालपुरा गावात आपल्या माहेरी चालली होती. बस्सीपर्यंत ही महिला आपल्या ओळखीच्या व्यक्तीसह मोटारसायकलवर आली. त्यानंतर महिला बसमध्ये बसून रामगड पाचवाडा येथील सोनद बसस्थानकावर पोहोचली. मात्र बसस्थानकापासून महिलेचे माहेर सुमारे 7 किलोमीटर असून वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कार चालकाने या महिलेला आणि एका मुलाला लिफ्ट दिली. (Under the pretext of giving a lift, the woman was abused and killed in the car)

माहेरी चालली होती महिला

सदर मुलगा काही अंतरावर उतरला. मात्र महिलेचे गाव पुढे होते. यानंतर नराधमांनी महिलेवर गँगरेप केला. गँगरेपनंतर आरोपी महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गाडीत ठेवून 3 ते 4 तास फिरत होते. महिला दुसऱ्या दिवसापर्यंत घरी न पोहचल्यामुळे नातेवाईकांनी 24 एप्रिलला रामगढ पचवारा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्याआधारे पोलिसांनी एका आरोपीला अटक केले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आला असून अन्य 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे.

संतप्त नातेवाईकांचे धरणे आंदोलन

गँगरेप आणि हत्येनंतर महिलेचा मृतदेह आरोपींनी बस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विहिरीत टाकल्याचे सांगितले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींसह घटनास्थळी पोहोचले आणि तुंगा आणि बस्सी पोलीस ठाण्याच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. संपूर्ण प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी आणि नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी नातेवाईकांनी धरणे आंदोलन केले. दौसा जिल्हा रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर चक्का जाम केला. मात्र पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत प्रकरण शांत केले. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Under the pretext of giving a lift, the woman was abused and killed in the car)

इतर बातम्या

Ulhasnagar Murder : उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून केलं कृत्य

fighting in the mall : पार्टीत गोंधळ आणि मारहान; नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये बाऊन्सर्सने घेतला तरुणाचा जीव

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.