AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Civil Code : बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडुं नको..समान नागरी कायद्यासाठी या सरकारपुढे पडला सूचनांचा पाऊस..

Civil Code : समान नागरी कायद्यासाठी भाजप शासित राज्यांत प्रयोग राबविण्यात येत आहे..काय आहे अपडेट्स..

Civil Code : बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडुं नको..समान नागरी कायद्यासाठी या सरकारपुढे पडला सूचनांचा पाऊस..
समान नागरी कायद्यासाठी तयारी Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 01, 2022 | 4:04 PM
Share

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीपूर्वी (Gujrat Election) भाजपने समान नागरी कायद्याचे (Uniform Civil Code) कार्ड खेळून ‘आप’च्या (AAP) हिंदुत्वाच्या खेळीची हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर राज्यात दावेदारी पक्की करण्यासाठी पाऊल टाकले आहे. यापूर्वी भाजपने उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) ही समान नागरी कायद्यासाठी जमीन कसली आहे. या राज्यातून काही अपडेट्स येत आहे..

गुजरातमध्ये उत्तराखंडासारखंच भाजप सत्तेत येऊ इच्छित आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलल्याचा भाजपला फायद्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रयोग गुजरातमध्ये ही राबविण्यात येत आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायद्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीला आतापर्यंत 1 लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे समान नागरी कायद्यासाठी जनतेने, तज्ज्ञांनी एवढ्या सूचना केल्या आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान फेब्रुवारी महिन्यात धामी यांनी समान नागरी कायद्यासाठी एक समिती गठित करण्याची घोषणा केली होती. हे वचन त्यांनी पूर्ण केले. समिती गठित केली. पण ज्यांना लागलीच हा कायद्या लागू करावा असे वाटत होते. त्यांना ही वाट बिकट असल्याचे लक्षात येत आहे.

गठित समिती उत्तराखंड राज्यातील जनतेसाठी समान नागरी कायद्यासाठी कायदेशीर प्रस्ताव तयार करणार आहे. त्यासाठी एक संहिता ही तयार करण्यात येत आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत समितीचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, सामाजिक कार्यकर्ता मनु गौड, पूर्व मुख्य सचिव शत्रुघ्न सिंह आणि सुरेखा डंगवाल यांचा या समितीत समावेश आहे. या समितीची 4 जुलै रोजी पहिली बैठक झाली.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.