ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं माहिती दिली नाही, आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत मांडलं वास्तव

संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं.

ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं माहिती दिली नाही, आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत मांडलं वास्तव
Health Minister Mansukh Mandviya
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 12:33 PM

नवी दिल्ली: संसदेचं (Parliament Winter Session) हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत (Lok Sabha ) कोरोना विषाणू संसर्गावर (Corona Virus) चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं. मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

महाराष्ट्रानं माहिती दिली नाही

मनसुख मांडवीय यांनी ॲाक्सिजनमुळे किती कोरोना रूग्ण दगावले याची माहिती अद्याप महाराष्ट्र सरकारने दिली नाही, अशी माहिती दिली. केंद्र सहरकारला केवळ 19 राज्यांनी माहिती दिली. त्यात महाराष्ट्राचा सहभाग नाही, असंही केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.

केवळ पंजाबनं ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती दिली

मनसूख मांडवीय म्हणाले की, आम्ही राज्यांना ॲाक्सिजन अभावी कितीजण दगावले असल्याची माहिती मागवली होती. पण, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली. त्यात केवळ पंजाबनं सांगितले की 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, असं मनसूख मांडवीय म्हणाले.

केंद्राला माहिती कळवणारी राज्यं

अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी माहिती दिली.

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रश्नाला उत्तर

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ऑक्सिजन अभावी किती जणांचा मृत्यू झाला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत माहिती दिली.

लोकसभेत कोरोनावर चर्चा सुरु

लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु असून कालच्या दिवशी ऐतिहासिक चर्चा पार पडली. काल रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत सुरू लोकसभेत चर्चा होती. मध्यरात्री लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. आज पुन्हा कोरोनावर चर्चा सुरु आहे. काल दिवसभरात 74 खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला. शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांनी लोकसभा कामकाजात सहभाग घेतला. पीएम केअरमधून देण्यात आलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स बंद असल्याची माहिती राऊत यांनी लोकसभेत दिली होती.

इतर बातम्या:

औरंगाबाद महापालिका मार्चपर्यंत काढणार 300 कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी प्रकल्पात हिस्सा टाकण्यासाठी मोठे पाऊल!

महाराष्ट्राची चिंता वाढली! परदेशातून आलेल्या 485 जणांची चाचणी, 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनबाबत तपासणी होणार

Union Health Minister Mansukh Mandaviya said Maharashta not gave information about corona patients deaths due to lack of Oxygen gave answer at Lok Sabha

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.