औरंगाबाद महापालिका मार्चपर्यंत काढणार 300 कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी प्रकल्पात हिस्सा टाकण्यासाठी मोठे पाऊल!

स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी महापालिकेला एकूण 250 कोटी रुपयांचा हिस्सा टाकायचा आहे. यापूर्वी 68 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. सध्या महापालिका कर्जमुक्त आहे. त्यामुळे आता नव्याने 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले आहे.

औरंगाबाद महापालिका मार्चपर्यंत काढणार 300 कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी प्रकल्पात हिस्सा टाकण्यासाठी मोठे पाऊल!
औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 12:14 PM

औरंगाबादः स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पाअंतर्गत शहराचा विकास करण्याकरिता औरंगाबाद महापालिकेला (Aurangabad municipal corporation) या प्रकल्पात आपल्या वाट्याचा निधी टाकायचा आहे. त्यामुळे महापालिकेने तीनशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हिस्सा वापरल्यानंतर उरलेला निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि कार्बन झिरो बाँडच्या विक्रीतून हे कर्ज मिळवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीसाठी 250 कोटींचा पालिकेचा हिस्सा

महापालिकेचे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी महापालिकेला एकूण 250 कोटी रुपयांचा हिस्सा टाकायचा आहे. यापूर्वी 68 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. महापालिकेने यापूर्वी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सध्या महापालिका कर्जमुक्त आहे. त्यामुळे आता नव्याने 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, मार्च महिन्यापर्यंत कर्जाची प्रक्रिया होईल. स्मार्ट सिटीचा हिस्सा काढल्यानंतर उर्वरीत रक्कम विकास कामांसाठी वापरली जाईल.

इलेक्ट्रिक बसची खरेदी करणार

शहरातील सिटी बस सेवेत सध्या शंभर स्मार्ट बस आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आता महापालिका आणखी वीस बस खरेदी करणार आहे. या बस ऐतिहासिक स्थळे आणि वारसा स्थळांच्या मार्गावर चालवल्या जातील. नवीन पाणी पुरवठा योजना सोलारवर चालवण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासक पांडेय यांनी दिली.

इतर बातम्या-

सासरच्यांनी बाळ हिरावले, व्याकुळ मातेला औरंगाबादमधील दामिनी पथकाचा हात, 5 दिवसांनी आईच्या कुशीत विसावले

Mumbai Rains : मुंबईत गुरुवारी रेकॉर्डब्रेक पाऊस, डिसेंबरमधील सर्वाधिक पावसाची नोंद

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.