AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेसाठी हात जोडले, करंट लागताच चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू, 40 जखमी, कुठे घडलं?

श्रावणातील आज पहिला सोमवार असून एक अत्यंत मोठी दुर्घटना घडलीये, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विजेची तार तुटल्याने मंदिरात मोठा गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पूजेसाठी हात जोडले, करंट लागताच चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू, 40 जखमी, कुठे घडलं?
| Edited By: | Updated on: Jul 28, 2025 | 8:43 AM
Share

एक अत्यंत मोठी दुर्घटना घडलीये. आज पहिला श्रावणी सोमवारी असल्याने काल रात्रीपासूनच भाविकांनी मंदिरांबाहेर मोठी गर्दी केलीये. यादरम्यान एक दुर्घटना घडलीये. मंदिराबाहेर भाविकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला पत्राचा शेड आणि विद्युत प्रवाहाचा संपर्कात आल्याने मोठी दुर्घटना घडली. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील अवसनेश्वर मंदिराबाहेर ही घटना घडलीये. करंट लागल्याने यावेळी दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने 40 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. 

करंट लागल्याने दोन जणांचा मृत्यू मोठी खळबळ 

मृतांपैकी एकाची ओळख पटली असून तो मुबारकपूर येथील रहिवासी आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी चेंगराचेंगरी देखील झाली, यावेळी काही लोक जखमी झाल्याचीही माहिती मिळतंय. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी मध्यरात्री तीनच्या दरम्यान घडलीये. 

विजेची तार तुटल्याने मंदीर परिसरात चेंगराचेंगरी 

एका माकडाने विजेच्या तारेवर उडी मारल्याने तार तुटली, असल्याचे सांगितले गेले. यानंतर भाविकांनी एकच गोंधळ सुरू केला. घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दोन जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी 

रिपोर्टनुसार, प्रशासनाकडून सांगण्यात आले की, काही माकडांनी विजेच्या तारेवर उडी मारली. ज्यामुळे तार तुटली आणि मंदिराच्या परिसरातील शेडवर पडली आणि करंट लागला. यानंतर भाविकांनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेमध्ये दोन जणांचा जीव गेला असून 40 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची अधिकची माहिती ही प्रशासनाकडून घेतली जात आहे. या घटनेची अजूनही चाैकशी सुरू असून मंदिर प्रशासनाने यावर भाष्य करणे टाळले आहे. श्रावणी सोमवार असल्याचे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक विजेची तार तुटल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.