AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जमिनीच्या वादातून गोळीबार, 9 जणांचा मृत्यू, 25 जखमी
| Updated on: Jul 17, 2019 | 6:16 PM
Share

सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारानंतर गावात पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा गोळीबार गावाचा सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावाजवळील रुग्णालयात मृत आणि जखमींना आणण्यात आलं. यावेळी नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेटची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांना स्वत: या घटनेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींना आरोग्यासेवा पुरवण्यात कुठलाही हलगर्जीपणा होता कामा नये, असंही योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात बेपत्ता 3 चिमुकले लाल कारमध्ये आढळले, दोघांचा गुदमरुन मृत्यू

मुंबईतील टीव्ही अँकरला अश्लील मेसेज, विकृताला पश्चिम बंगालमधून अटक

किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड

VIDEO : बंदूकबाज बाप, गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हातात, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटस

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...