AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir: गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार मिळाल्याने दहशतवादी भडकले, हल्ले अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा

त्यात सरकारी कर्मचारी, बिझनेसमॅन, मजूर, भिकारी, पर्यटक, जम्मू काश्मीर पोलीस, निमलष्करी दल, स्थानिक माहिती देणारे गद्दार या सगळ्यांना लक्ष्य करण्यात येईल, असे या साईटवर लिहिण्यात आले आहे. इतकेच नाही तर या परप्रातियांची घरे आणि तळे उद्ध्वस्त करण्यात येतील, जाळण्यात येतील असाही इशारा देण्यात आला आहे.

Kashmir: गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार मिळाल्याने दहशतवादी भडकले, हल्ले अधिक तीव्र करण्याचा दिला इशारा
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचे सत्रImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 8:31 PM
Share

श्रीनगर- केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir)इतर राज्यातील मतदारांनाही मतदानाचा (voting rights) अधिकार दिलेला आहे. या घोषणेनंतर लष्कर-ए-तोयबा समर्थित दहशतवादी ग्रुप काश्मीर फाइटने गैर काश्मिरी नागरिकांवर हल्ले वाढवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या (terrorist)एका वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की – जेव्हा जिंकण्याचे मोठे कारण असते, तेव्हा मोठ्या संख्येने अनेकांचे प्राणही जातात. आमच्यापैकी कुणालाही हे आवडलेले नाही. मात्र हे सत्य आहे. सगळ्या गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की दिल्लीकडून हा घाणेरडा खेळ खेळला जातो आहे. अशा स्थितीत हल्लांची तीव्रता अधिक वाढवणे गरजेचे झाले आहे. आपल्या लक्ष्याप्रती प्राथमिकता देण्याची ही वेळ आहे. या पोस्टमध्ये कुणाला टार्गेट करणार याचीही माहिती देण्यात आली आहे.

कुणाकुणाला करणार टार्गेट?

यात लिहिण्यात आले आहे की, प्रत्येक परप्रांतीयाला हे हल्ले सहन करावे लागतील. त्यात सरकारी कर्मचारी, बिझनेसमॅन, मजूर, भिकारी, पर्यटक, जम्मू काश्मीर पोलीस, निमलष्करी दल, स्थानिक माहिती देणारे गद्दार या सगळ्यांना लक्ष्य करण्यात येईल, असे या साईटवर लिहिण्यात आले आहे. इतकेच नाही तर या परप्रातियांची घरे आणि तळे उद्ध्वस्त करण्यात येतील, जाळण्यात येतील असाही इशारा देण्यात आला आहे. आश्रितांच्या छावण्यांनाही टार्गेट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जम्मू आणि बाहेरच्या परिसरातही हे हल्ले करण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपा घाबरली, ओमर यांची प्रतिक्रिया तर मुफ्ती यांनीही केली टीका

निवडणूक आयोगाने केलेल्या या घोषणेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की- भाजपा निवडणुकांपूर्वीच घाबरलेली आहे. या राजकारण्यांना काश्मिरी जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, त्यामुळे बाहेरच्या लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची यांची तयारी दिसते आहे. तर माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की- पहिल्यांदा काश्मीरातील निवडणुका स्थगित करणे आणि आता बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे मतदार यादीत टाकणे, यामागे यांची काय मनिषा आहे, दिल्लीवाले काश्मीरवर कठोर शासन करु इच्छितात. असे त्यांनी लिहिले आहे.

काय आहे गणित?

केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मिरात 20 जिल्हे आहेत. यातले 10 जिल्हे जम्मूत आणि 10 जिल्हे काश्मीरमध्ये आहेत. इथली लोकसंख्या 1 कोटी 25 लाख 41 हजार 302 इतकी आहे. सगळ्यात मोठा जिल्हा किश्तवाड आणि सगळ्यात छोटा शोपिया जिल्हा आहे. सर्वाधिक शिक्षित लोक हे जम्मूत तर  कमी शिकलेले रामबनमध्ये आहेत. राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे 2 लाख 22 हजार 236 किमी आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.