AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Waqf Amendment Bill लोकसभेत सादर, आमची समिती डोकं चालवते, अमित शाह संसदेत काय बोलले?

Waqf Amendment Bill बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर झालं आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत हे विधेयक मांडलं. हे विधेयक मांडत असताना लोकसभेत गोंधळ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या विधेयकावर बोलले आहेत.

Waqf Amendment Bill लोकसभेत सादर, आमची समिती डोकं चालवते, अमित शाह संसदेत काय बोलले?
Amit ShahImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 12:54 PM
Share

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना गोंधळ झाला. “वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीय. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीय. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे” असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक मांडलं जात असताना काँग्रेसवर सडकून टीका केली.

“माननीय सदस्याने जो पॉइंट ऑफ ऑर्डर उचलला आहे, भारत सरकारच्या कॅबिनेटने या विषयी विधेयक मंजूर करुन सभागृहासमोर मांडलं. सभापती तुमच्याद्वारे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीला दिलं. विरोधी पक्षाचा हा आग्रह होता. समितीने यावर सुविचार करुन आपल मत प्रगट केलं. ते जे मत प्रगट केलं, ते पुन्हा कॅबिनेटसमोर आलं. कमिटीचे जे सल्ले होते, ते भारत सरकारच्य कॅबिनेटने स्वीकारले आणि सुधारणा म्हणून ते सल्ले किरेन रिज्जू यांनी मांडल्या. यात काही पॉइंट ऑफ ऑर्डर मला वाटत नाही” असं अमित शाह म्हणाले.

‘तर मग कमिटी कशाला हवी?’

“तुमचा आग्रह होता की, संयुक्त संसदीय समिती बनवा. आमची काँग्रेससारखी समिती नाही, आमची लोकशाहीप्रधान समिती आहे. आमची समिती डोकं चालवते, काँग्रेसच्या जमान्यात कमिटी शिक्का मारायच्या. आमची कमिटी चर्चा करते. चर्चेच्या आधारावर विचार आणि परिवर्तन करते. परिवर्तन स्वीकारायच नसेल, तर मग कमिटी कशाला हवी?” असा सवाल अमित शाह यांनी विचारला.

संसदेत भाजपचा नंबर गेम काय?

लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर होण्यासाठी 272 मतांची गरज आहे. 542 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत भाजपचे 240 खासदार आहेत. 12 जे़डीयू, 16 टीडीपी, पाच एलजेपी, राष्ट्रीय लोकदलचे दोन आणि शिवसेनेचे सात आहेत. NDA च्या सर्व घटक पक्षांनी भाजपची साथ दिली, तर हे विधेयक सहज मंजूर होईल. राज्यसभेत NDA चे 125 खासदार आहेत. यात भाजपचे 98 सदस्य आहेत.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.