AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणीही दिशाभूल करायला, आम्ही काय लहान मुलं नव्हे; ओवेसींचे मोहन भागवतांना चोख प्रत्युत्तर

CAA कायद्यामुळे देशाला कोणताही धोका नाही. यावरुन मुस्लीम समाजात जाणीवपूर्वक संभ्रम पसरवला जात असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. | Asaduddin Owaisi

कोणीही दिशाभूल करायला, आम्ही काय लहान मुलं नव्हे; ओवेसींचे मोहन भागवतांना चोख प्रत्युत्तर
| Updated on: Oct 25, 2020 | 6:09 PM
Share

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) देशातील मुस्लीम समाजामध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात. परंतु, कोणीही दिशाभूल करायला आम्ही काही लहान मुलं नव्हे, अशी शब्दांत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली. (Asaduddin Owaisi hits back Mohan Bhagwat)

दसऱ्यानिमित्त नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी CAA कायद्यासंदर्भात भाष्य केले होते. CAA कायद्यामुळे देशाला कोणताही धोका नाही. यावरुन मुस्लीम समाजात जाणीवपूर्वक संभ्रम पसरवला जात असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.

सरसंघचालकांच्या या वक्तव्याचा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. कोणीही दिशाभूल करायला आम्ही काही लहान मुले नाही. CAA आणि NRC या कायद्यांचा अर्थ भाजपने अजून स्पष्ट केलेला नाही. हे कायदे केवळ मुस्लिमांसाठी नसतील तर त्यामधून धर्माचा उल्लेख का हटवला जात नाही? या कायद्यात स्वत:चे राष्ट्रीयत्त्व सिद्ध करण्याची अट राहील, तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू. धर्माच्या आधारावर राष्ट्रीयत्त्व ठरवणाऱ्या प्रत्येक कायद्याला आमचा विरोध असेल, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.

मला राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायचंय की, आंदोलनावेळी तुम्ही बाळगलेलं मौन आम्ही विसरलेलो नाही. भाजपचे नेते सीमांचलच्या लोकांना घुसखोर म्हणत असताना राजद व काँग्रेसने तोंडातून चकार शब्द न काढल्याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर दिल्लीत हिंसाचार उफाळला होता. शाहीन बागेसह दिल्लीच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाले होती. यापैकी काही आंदोलनांनी हिंसक वळण घेतल्याने दिल्लीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या शाहीन बागेत १०० दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरु होते.

संबंधित बातम्या:

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय – भागवत

आंदोलक अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवू शकत नाहीत: सर्वोच्च न्यायालय

(Asaduddin Owaisi hits back Mohan Bhagwat)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.