AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय – भागवत

नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे, असं मत मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं.

कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय - भागवत
sagar joshi
sagar joshi | Updated on: Oct 25, 2020 | 9:54 AM
Share

नागपूर: ‘जगभरात सध्या कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनामुळं अनेकांचा बळी गेला, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. पण या कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे’, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला मोजकेच स्वयंसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवक या दसरा मेळाव्यात सहभागी झाले. (RSS mohan bhagwat on corona and society)

भारतीय संस्कृतीचं मूल्य असलेला सेवाभाव आपण विसरलो होतो. पण कोरोना काळात तो पुन्हा एकदा जागृत झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकानं या काळात एकमेकांना सहाय्य केल्याचं पाहायला मिळालं, अशी भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केली. कोरोनामुळं अनेकांचा मृत्यू झाला, कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणारे अनेक डॉक्टर आणि कर्मचारीही मृत पावले. त्यांना भागवत यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच निस्वार्थ भावनेनं सेवा करणाऱ्यांचं अभिनंदनही त्यांनी आपल्या भाषणात केलं. कोरोनामुळं निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक परिणामांतून स्वत:ला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी मदत करा, असं आवाहनही भागवत यांनी जनतेला केलं आहे.

कोरोनाकाळात अनेक मजूर गावी गेले. त्यातील काही आज परतले आहेत. पण काही क्षेत्रात कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळं कामगारांना नव्याने प्रशिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत भागवत यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पालकांच्या नोकऱ्या गेल्यानं अनेक संस्थाचालकांना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क मिळालं नाही. त्यामुळं हजारो शिक्षकांचे पगार रखडले आहेत. अशावेळी शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदलाची गरजही भागवत यांनी व्यक्त केली. कोरोनाचे जसे वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. तसेच निसर्ग पुन्हा एकदा समृद्ध झालेला पाहायला मिळाल्याचं यावेळी भागवत म्हणाले.

‘तुकडे-तुकडे गँग’वर भागवतांचा हल्लाबोल –

भारत ते तुकडे होंगे म्हणणारेच वेळप्रसंगी संविधानाचे दाखले देतात. अशा लोकांपासून समाजानं साधव राहणं गरजेचं आहे. असे लोक संघाबाबत चुकीचं मत पसरवण्याचं काम करत आहेत. पण संध आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ असल्याचा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

RSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला : मोहन भागवत

RSS mohan bhagwat on corona and society

Follow Us
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात