एक्झिट पोलच्या आकड्यात बंगालमध्ये सत्तापालट, ग्राऊंडवर काय काय घडलं? भाजपापुढे आव्हानं काय होती?
ही निवडणूक आता केवळ पश्चिम बंगाल या राज्य सचिवालयात कोण पोहोचणार यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर 15 वर्षांच्या सत्ताकाळानंतरही ममता बॅनर्जी बंगालमधील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून कायम राहणार की नाही, याकडे .

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. तरीही त्यांना सत्ता मिळाली नाही, पण जनाधार नक्कीच वाढला. आता प्रश्न असा आहे की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) विरुद्ध असलेल्या ‘सत्ताविरोधी’ (Anti-incumbency) लाटेचा फायदा भाजप यावेळी घेऊ शकेल का? मुख्य म्हणजे, ममता सरकारबद्दलचा असंतोष भाजप मतांमध्ये रूपांतरित करण्यात यशस्वी झाला असेल का? यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. ते नेमके कोणते? जाणून घ्या… तज्ज्ञांच्या मते, बंगालमधील सत्ताविरोधी लाट खरी ठरण्याची शक्यता आहे, परंतु ती संपूर्ण राज्यात एकसमान दिसत नाही. ही लाट विखुरलेल्या अवस्थेत आहे. मतदारांमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकटाबाबत संताप आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, प्रशासन...
