AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2024 : लातूरसारख्या छोट्या शहरातही डिजिटायजेशनने प्रचंड बदल; अभय भूतडा यांचं महत्त्वाचं विधान

देशाच्या राजधानीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट सुरू झाली आहे. देशातील या सर्वात मोठ्या महाइव्हेंटमध्ये देशातीलच नव्हे तर जगातील दिग्गज सामील झाले आहेत. यावेळी फायनान्स सेक्टरमधील कंपनी पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.

WITT 2024 : लातूरसारख्या छोट्या शहरातही डिजिटायजेशनने प्रचंड बदल; अभय भूतडा यांचं महत्त्वाचं विधान
abhay bhutada Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 25, 2024 | 8:25 PM
Share

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : फायनान्स सेक्टरमधील कंपनी पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. मी महाराष्ट्रातील लातूरचा रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षापासून मी लातूरमधील बदल जवळून पाहत आहे. मोदी सरकारने डिजिटल युगाला सुरुवात केली. त्यामुळे छोट्या शहरातील आमच्या सारख्या अनेकांना असंख्य अडचणींवर मात करता आली आहे, असं अभय भुतडा यांनी सांगितलं. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये ते बोलत होते.

लातूरसारख्या छोट्या शहरातही बदल होत आहे. हे माझं शहर आहे. मी या शहरात अनेक बदल होताना पाहिले आहेत. देशातील डिजिटल क्रांतीने छोट्या शहरातील लोकांच्यासमोरील अनेक अडचणी संपवण्याचं काम केलं आहे. राष्ट्र निर्माणासाठी तुम्ही योगदान देत आहात हा विश्वास त्यातून निर्माण झाला आहे, असं अभय भुतडा म्हणाले.

डिजिटल सोल्यूशनचं नवं मार्केट

भारतात यावेळी डीजिटल क्रांती होत आहे. या डिजिटल क्रांतीने डिजिटल आणि टेक सोल्यूशन्ससाठी एक नवं मार्केट तयार केलं आहे. भारत सरकारची पंतप्रधान जनधन योजना, यूपीआय आणि भीम सारख्या योजनांना लोकांमध्ये सर्वसमावेशकता आणली आहे. एवढेच नव्हे तर देशात डिजिटल पेमेंटचा आधारही वाढला आहे. त्यात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे, ई-कॉमर्सचा विस्तार, लोकांमध्ये फोन वापरण्याचं प्रमाण वाढणं या प्रमुख घटना आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विश्वगुरू बनण्याचा विश्वास

डिजिटलमुळे समाजातील प्रत्येक वर्गाच्या आकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सकारात्मकरित्या मदत केली जात आहे. मी लातूरसारख्या छोट्या शहरातून येतो. या शहरात डिजिटलचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्व अडचणींवर मात करता आली आहे. डिजिटल युगामुळे प्रत्येत व्यक्तीला राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. तसेच आपण विश्व गुरू बनू शकतो, तेवढी आपली क्षमता आहे, हा विश्वास लोकांच्या मनातही निर्माण झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कणखर, गतिशील नेतृत्व, नवविचाराचा ध्यास, उद्योजकता आणि मानवतेच्या विकासाचा ध्यास यामुळे भारत एक महासत्ता म्हणून भारताच्या स्थितीची पृष्टी करेल असा निष्कर्ष मी काढलेला आहे.

Follow Us
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु