AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यामागे काय आहे भाजपचा मास्टर प्लान?

बिहारच्या राजकारणात सध्या सत्तासंघर्षासाठी खलबतं सुरु आहेत. जेडीयू आरजेडी पासून वेगळी होऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. तर आरजेडी देखील जेडीयूला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू नये म्हणून प्रयत्न करत आहे. भाजपचा मास्टर प्लान मात्र वेगळा आहे.

बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यामागे काय आहे भाजपचा मास्टर प्लान?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 26, 2024 | 7:50 PM
Share

Bihar politics : बिहारच्या राजकारणात सध्या चांगलाच गोंधळ सुरू आहे. राज्यातला हा गोंधळ देशाच्या राजकारणावर देखील मोठा परिणाम करु शकतो. कारण लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. आरजेडी आणि जेडीयू युती तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अजून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. आरजेडीकडून त्यांना भूमिका लवकर स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हा गोंधळ सुरु असतानाच आणखी एक बातमी पुढे आली आहे. ती म्हणजे काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार एक वेगळा गट बनवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.

बिहारमध्ये राजकीय संकट

काँग्रेसचे 10 आमदार वेगळे झाले तर आरजेडीचा खेळ बिघडणार आहे. सध्याच्या परिस्थितीत, नितीश कुमार वेगळे झाले तर ते बहुमतापासून 8 आमदार मागे असतील. त्यामुळे मांझी यांचे 4 आमदार, AIMIM चा 1 आमदार, सुमित सिंग (अपक्ष) यांचा समावेश करून ही दरी भरून काढू शकतात. पण आता बातमी अशी आहे की, काँग्रेसच्या एकूण 19 पैकी 10 आमदारांनीही पक्षांतर केले, तर मात्र बहुमताचा आकडा गाठणं त्यांना कठीण होईल.

पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना मानाची जागा दिली जाईल असं भाजपकडून आश्वासन दिले गेले आहे. नितीश कुमार आणि कुशवाह एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत भाजपला देखील मोठा फायदा होईल. 2025 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुती मजबूत करण्यासाठी तयारी करत आहे.

नितीश कुमार का आहेत नाराज?

नितीश कुमार काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत संयोजक पद न दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. जागावाटपात होत नसलेलं एकमत, विलंब आणि समन्वयकपदाचा निर्णय न झाल्याने नितीश कुमार काँग्रेसवर नाराज आहेत.

बिहारला इतके महत्त्व का?

बिहारमध्ये JDU चे 17 (16+1) खासदार आहेत. त्यामुळे जेडीयूचे पारडे जड आहे. भाजपला देखील जेडीयूच्या मतांना फायदा होऊ शकता. कारण बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. भाजपच्या या जागांवर डोळा आहे. आगामी लोकसभा आणि २०२५ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचा मास्टरप्लान तयार आहे

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...