जर पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीसोबत बळजबरीने लग्न केलं तर काय शिक्षा होते? ऐकून धक्का बसेल

प्रत्येक देशाचे कायदे हे वेगवेगळे असतात, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की पाकिस्तानात समजा एखाद्या व्यक्तीने हिंदू मुलीसोबत बळजबरीने लग्न केलं तर त्याला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? त्याबद्दल जाणून घेऊयात.

जर पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीसोबत बळजबरीने लग्न केलं तर काय शिक्षा होते? ऐकून धक्का बसेल
marriage
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 9:53 PM

भारतामध्ये मुलीला किडनॅप करणं, तिच्यासोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरोधात लग्न करणं, अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणं, मुलीवर अत्याचार करणं किंवा तिचा छळ करणं या घटनांकडे गंभीर गुन्हा म्हणून पाहिलं जातं, आणि भारतीय संविधानानुसार यातील प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील काही प्रकरणात तर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. जेव्हा प्रश्न अल्पसंख्यांक समाजाचा येतो, तेव्हा तर हे प्रकरण आणखी गंभीर बनतं. परंतु तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की पाकिस्तानमध्ये जर हिंदू मुलींना किडनॅप केलं, किंवा त्यांच्या इच्छा विरोधात त्यांच्याशी लग्न केलं, जर हिंदू मुलीवर अत्याचार झाला तर पाकिस्तानमध्ये नेमकी काय शिक्षेची तरतूद आहे. या ठिकाणी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानमध्ये हिंदू समाज हा अल्पसंख्यांक समाज आहे.

पाकिस्तान पिनल केड (PPC) च्या सेक्शन 498B नुसार मुलगी कोणत्याही धर्माची असो ती अल्पसंख्यांक असो अथवा बहुसंख्यांक वर्गामधील, तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं तर तो गुन्हा मानण्यात येतो. त्यासाठी पाकिस्तानच्या कायद्यात तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल केला जातो. तसेच अत्याचार आणि किडनॅपिंगच्या केसमध्ये ही शिक्षा सात वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंत देखील होऊ शकते. मात्र जरी असं असलं तरी देखील एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार जेव्हा पाकिस्तानात हिंदू मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा पाकिस्तानमध्ये यासंदर्भात कायदा असून देखील तो खूप कमकुवत वाटतो.

एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये जेव्हा हिंदू धर्मातील मुलीसोबत मुस्लिम तरुणाने बळजबरीने लग्न केलं आणि तिचं धर्म परिवर्तन केलं तर अशा अनेक केसमध्ये तेथील कोर्टानं शरिया कायद्याचा हवाला देत हे प्रकरण गुन्हा नसल्याचा निकाल दिला आहे, तसेच या प्रकरणात अशा तरुणांची निर्दोष सुटका देखील केली आहे. फक्त हिंदूच नाही तर खिश्चन आणि इतरही अल्पसंख्यांक समाजाच्या बाबतीमध्ये असाच भेदभाव सुरू असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.