AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध म्हणजे काय? युद्ध झाल्यास काय होतं? 5 मुद्द्यात समजून घ्या; हे माहीत असायलाच हवं

युद्ध सुरू झाले तर त्याचा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, जर एखाद्या देशात युद्धाची घोषणा झाली तर त्या देशात सर्वात आधी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाते.

युद्ध म्हणजे काय? युद्ध झाल्यास काय होतं? 5 मुद्द्यात समजून घ्या; हे माहीत असायलाच हवं
| Updated on: May 10, 2025 | 4:49 PM
Share

परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून अत्यंत महत्त्वाच्या बाबी आपल्यासमोर आल्या आहेत. एकीकडे पाकिस्तानकडून कशा पद्धतीनं युद्धखोरीच्या कारवाया सुरू आहेत, याविषयी अधिकृत माहिती मिळाली. तर दुसरीकडे आपण कशा पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर देत आहोत, याबाबत देखील माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे, या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध जाहीर झालं म्हणजे नेमकं काय झालं, युद्धाचे काय परिणाम होऊ शकतता? या सर्व बाबींचं विश्लेषण संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक सतीश ढगे यांनी केलं आहे.

युद्ध जाहीर झाले म्हणजे नक्की काय झाले?

अजूनपर्यंत भारतानं युद्ध जाहीर केलेलं नाही, आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पाकिस्तान सोबत जी जी युद्ध झाली या कुठल्याही युद्धामध्ये अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. युद्ध जाहीर झाल्यास सर्व प्रथम त्या ठिकाणी आणीबाणीची घोषणा करण्यात येते.

युद्ध जाहीर कोण करते?

युद्ध जाहीर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो, जे तीन्ही सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर असतात.

युद्ध सुरू झाले तर एखाद्या देशात कोणत्या गोष्टी बदलतात?

युद्ध सुरू झाले तर त्याचा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, जर एखाद्या देशात युद्धाची घोषणा झाली तर त्या देशात सर्वात आधी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाते. तेथील नागरिकांच्या काही अधिकारांवर देखील मर्यादा येतात.

युद्धाचे काय परिणाम होतात

युद्धाचे खूप दूरगामी परिणाम होतात, अर्थव्यवस्थेपासून ते राजकीय व्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रावर युद्धाचे परिणाम होतात, युद्धाचा सर्वाधिक फटका हा नेहमी विकसंशील राष्ट्रांना अधिक बसत असतो. युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण होतात, त्यामुळे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होते. अनेक गोष्टींचं नुकसानं होतं. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. राष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान होतं. एवढंच नाही तर इतरही अनेक परिणाम पाहायला मिळतात.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.