काँग्रेस, आप आणि एमआयएम एकत्रित लढले असते तर गुजरातचं चित्रं काय असतं?; गुजरात फाईल काय सांगत्ये?

भाजपने गुजरातमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसने सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. आपने तीन तर एमआयएमने 13 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं.

काँग्रेस, आप आणि एमआयएम एकत्रित लढले असते तर गुजरातचं चित्रं काय असतं?; गुजरात फाईल काय सांगत्ये?
काँग्रेस, आप आणि एमआयएम एकत्रित लढले असते तर गुजरातचं चित्रं काय असतं?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 2:18 PM

अहमदाबाद: गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 182 पैकी 156 जागांवर भाजपने न भूतो न भविष्यती असा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ 17 आणि आम आदमी पार्टीला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या पराभवाला ओवैसी यांची एमआयएम आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी असल्याचं सांगितलं जात आहे. जर गुजरातमध्ये काँग्रेस, एमआयएम आणि आप एकत्र आले असते तर राज्याचं चित्रं काय असतं? यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये भाजपला 52.5 टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला 27.3 टक्के मते मिळाली आहेत. आम आदमी पार्टीला 12.3 आणि एमआयएमला 0.29 टक्के मते मिळाली आहेत. या तिन्ही पक्षाची मते एकत्रित केली तर ती 40.49 टक्के होतात. भाजपची एकूण मते 52.5 टक्के आहे. आकडेवारीत तिन्ही पक्षांपेक्षा भाजपची टक्केवारी अधिक दिसत असली तरी या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढली असती तर भाजपची टक्केवारी घटली असती. कारण अनेक मतदारसंघात या तिन्ही पक्षांनी एकमेकांचीच मते खाल्ली आहेत. भाजपची मते ओढलेली नाहीत.

हे सुद्धा वाचा

या निवडमुकीत एमआयएमने काँग्रेसची मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. तर आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या आदिवासी मतांना सुरुंग लावला आहे. गुजरातमधील मुसलमान नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे. गोध्रानंतर तर मुस्लिम मतदार कायम काँग्रेससोबतच राहिला. पण एमआयएमच्या एन्ट्रीनंतर काँग्रेसच्या या व्होट बँकला सुरुंग लागला आहे. त्यामुळे मतविभागणी झाल्याने भाजपचं फावलं.

भाजपने गुजरातमध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नव्हतं. काँग्रेसने सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. आपने तीन तर एमआयएमने 13 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत एमआयएमचा एकही उमेदवार निवडून लाना ही. तर आपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत.

अनेक मतदारसंघात केवळ एमआयएम आणि आपमुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. जर या ठिकाणी आप आणि एमआयएम नसती तर काँग्रेसचा सहज विजय झाला असता.

आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसला 30 जागांवर नुकसान झालं आहे. 30 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या ठिकाणी आपने मते खाल्ल्याने काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं आहे.

जाणकारांच्या मते काँग्रेस, एमआयएम आणि आप एकत्र लढले असते  किंवा आप आणि एमआयएमने गुजरातची निवडणूक लढली नसती तर काँग्रेसला 80च्या जवळपास जागा मिळाल्या असता. भाजपलाही 100च्या खालीच रोखता येऊ शकलं असतं. कदाचित राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली असती.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.