AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान यांच्या तोंडातले बिस्किट काढून घेणारा ‘हा’ दबंग अधिकारी कोण, ज्याची साडे सहा तासात झाली सहा ठिकाणी बदली

आयएएस झाल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना अधिकाऱ्यांना राजकीय नेते, मंत्री यांच्यासोबत तडजोडी कराव्या लागतात. त्यांचे ऐकले नाही तर संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र, त्यातही काही इमानदार अधिकारी असून त्यांच्या इमानदारीचे बक्षीस मिळते ते म्हणजे अनेक ठिकाणी होणाऱ्या बदल्या.

पंतप्रधान यांच्या तोंडातले बिस्किट काढून घेणारा 'हा' दबंग अधिकारी कोण, ज्याची साडे सहा तासात झाली सहा ठिकाणी बदली
SUPRIM COURT AND LOKSABHAImage Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: May 19, 2023 | 6:03 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात असे एक अधिकारी आहेत की ते कोणत्याही मंत्र्यांना आपल्या खात्याचे सचिव म्हणून नको असतात. कोणत्याही जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आमदारांना ते जिल्हाधिकारी म्हणून नको असतात. तरीही ते सर्वाधिक चर्चेत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त यामुळे ते जिथे जातात तिथे आपली छाप पाडतात. पण, प्रामुख्याने ते चर्चेत असतात ते त्यांच्या वारंवार होणारी बदल्यांमुळे. 16 वर्षात 20 वेळा बदल्या झालेले महाराष्ट्रातील ते एकमेव अधिकारी आहेत. हा अधिकारी आहे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे तुकाराम मुंडे. मात्र, एकाच दिवसात साडे सहा तासात सहा ठिकाणी बदली आल्याचा विक्रम आणखी एका दबंग अधिकाऱ्याच्या नावावर आहे.

आयएएस झाल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना अधिकाऱ्यांना राजकीय नेते, मंत्री यांच्यासोबत तडजोडी कराव्या लागतात. त्यांचे ऐकले नाही तर संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र, त्यातही काही इमानदार अधिकारी असून त्यांच्या इमानदारीचे बक्षीस मिळते ते म्हणजे अनेक ठिकाणी होणाऱ्या बदल्या. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी टी एन शेषन.

तामिळनाडूतुन 1955 च्या बॅचमधुन टी. एन. शेषन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. वाद आणि शेषन यांचं सुरुवातीपासूनच घट्ट नातं होतं. 15 मे 1933 रोजी त्यांचा जन्म केरळमधील पल्लकड जिल्ह्यात झाला. वडील त्यांना शाळेत दाखल करायला गेले तेव्हा त्यांचे वय आड येत होतं. तेव्हा त्यांची जन्मतारीख बदलण्यात आली होती. 1955 मध्ये आयएएस झाल्यावर त्यांना अनेकांनी जन्मतारीख बदलून घ्या असं सुचवलं, पण त्यांनी त्यास नकार दिला.

1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना शेषन यांना दिल्लीला बोलवण्यात आले. वन, संरक्षण आणि शेवटी मंत्रिमंडळाचे सचिव अशी त्यांची पदोन्नती झाली. तर, 1987 मध्ये पंतप्रधानांचे सुरक्षा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

डिसेंबर 1989 मध्ये सत्तांतर होईपर्यंत मंत्रिमंडळ सचिव आणि पंतप्रधानांचे सुरक्षा सचिव अशा दोन्ही जबाबदाऱ्या शेषन सांभाळत होते. या काळात त्यांनी राजीव गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांची सुरक्षा अतिशय कौशल्यानं पार पाडली.

पंतप्रधान यांच्या तोंडातून बिस्किट काढून घेतले

पंतप्रधान राजीव गांधी यांचे सुरक्षा सचिव असताना त्यांनी एकदा थेट पंतप्रधान यांच्या तोंडातून बिस्किट काढून घेतले होते. याचे कारण म्हणजे 1986 मध्ये राजीव गांधी यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेची चौकशी शेषन यांची केली होती. हा प्रयत्न फसल्यानंतर पंतप्रधान यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो या दृष्टीने त्यांचे सुरक्षा सचिव म्हणून शेषन अतिशय काळजीपूर्वक निणर्य घेत होते.

साडे सहा तासात सहा ठिकाणी बदली

1962 मध्ये टी. एन. शेषन उपजिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी एका अधिकाऱ्याला घोटाळा करण्यापासुन रोखले होते. त्या अधिकाऱ्याने थेट मंत्र्याला गाठून आम्हाला पैसे खाऊ देत नाहीत अशी तक्रार केली. त्या मंत्र्यांनी लगेच फोन फिरवले. सुत्रे हलवली गेली आणि शेषन यांची बदल झाली.

त्यांची जिथे बदली केली त्यांनाही शेषन आपल्या कार्यालयात नको होते. पुन्हा मंत्र्यांचे फोन गेले असे दोन नव्हे तर सहा वेळा घडले आणि एकाच दिवशी सकाळी 10.30 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टी एन शेषन यांची सहा वेळा बदली करण्यात आली. हा एक विक्रम त्यांच्या नावे जमा झाला.

मंत्र्याने गाडीतून खाली उतरवले

तामिळनाडूमध्ये जिल्हाधिकारी असतानाची ही घटना आहे. एका मंत्र्याने त्यांना आपल्या सोबत गाडीत घेतले. गाडीत असतानाच त्या मंत्र्याने शेषन यांना एक नियमात न बसणारे काम सांगितले. त्यांनी ते काम करण्यास नकार दिला. त्यावर मंत्र्यांनी चिडून त्यांना थेट गाडीतून खाली उतरवले. निर्मनुष्य अशा त्या रस्त्यावरून शेषन यांनी पायी चालत पुढचा प्रवास केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणून वादळी कारकीर्द

मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर शेषन यांनी आयोगाच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवला. घटनात्मक कायद्याचा आधार घेऊनच शेषन यांनी आपली भूमिका जनतेपर्यंत पोहचवली. आयोगाकडे निवडणूक खर्चाबाबत जवळपास 40 हजार प्रकरणे प्रलंबित होती. शेषन यांनी त्यांची छाननी केली. ज्यांनी ठराविक नमुन्यात खर्चाचं विवरण दिले नव्हते अशा 14 हजार लोकप्रतिनिधींना त्यांनी पुढची निवडणूक लढवण्याला मनाई घातली.

Follow Us
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...