AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णा हजारे अदृश्य झाले, लोकांच्या मनात शंका आहे; संजय राऊत असं का म्हणाले?

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत? सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही?

अण्णा हजारे अदृश्य झाले, लोकांच्या मनात शंका आहे; संजय राऊत असं का म्हणाले?
अण्णा हजारे अदृश्य झाले, लोकांच्या मनात शंका आहे; संजय राऊत असं का म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 24, 2022 | 11:40 AM
Share

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंड घोटाळा उघड झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे केंद्रसरकारला दिली आहेत. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनाही काही कागदपत्रे दिली आहेत. मात्र, शिंदे यांच्या या घोटाळ्यावरून राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाच टार्गेट केलं आहे. अण्णा हजारे कुठे अदृश्य झाले आहेत. ते राज्यातील घोटाळ्यांवर का बोलत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत? सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही? असा सवाल करतानाच इतके दिवस अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यानंतर ते अदृश्य झाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राज्यात एक सरकार आलं. ते भ्रष्ट मार्गाने आलं. त्या भ्रष्ट सरकारवर अण्णांनी भूमिका घेऊन जाब विचारल्याचं दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. देशभरात केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि अनेक राज्यातील सरकार भ्रष्टाचार करून सत्ता टिकवत आहे. आमदार विकत घेत आहेत. खासदार विकत घेत आहे, त्यावर कुणीच कसं बोलत नाही? असा सवालही राऊत यांनी केला.

अण्णा हजारेंनी लोकायुक्त आणण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुप्तपणे चौकशी होईल. गुप्त का? उघड का नाही? होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी… लोकायुक्तांबाबतचं बिल आल्यावर काय करायचं ते पाहू, असंही ते म्हणाले.

रामसेतूचं अस्तित्व नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यावरूनही त्यांनी केंद्रावर टीका केली. रामसेतूचं अस्तित्व नव्हतं तर रामायणातील कथा या दंतकथा होत्या का? असा सवाल करतानाच रामसेतूचं अस्तित्व नष्ट झालं. उद्या रामाच्या अस्तित्वारही प्रश्नचिन्हं उभे करतील, अशी टीका त्यांनी केली.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.