AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

67 पाकिस्तानींच्या सुरक्षेसाठी भारताचे 680 सशस्त्र जवान का आहेत तैनात, नेमकं कारण काय?

या यात्रेकरूंचं स्पेशल ट्रेनन भारतामध्ये आगमन झालं, भारत सरकार आणि राजस्थान सरकारकडून त्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

67 पाकिस्तानींच्या सुरक्षेसाठी भारताचे 680 सशस्त्र जवान का आहेत तैनात, नेमकं कारण काय?
| Updated on: Jan 07, 2025 | 10:05 PM
Share

हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गाचा 813 वा वार्षिक उरूस सुरू आहे. या उरूसात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी यात्रेकरूंचा एक मोठा गट सोमवारी पहाटे 3.30 वाजता राजस्थानमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये एकूण 67 यात्रेकरूंचा समावेश आहे. या यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकार आणि राजस्थान सरकारकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. 67 पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतातील 680 सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

हे यात्रेकरू स्पेशल ट्रेनने अजमेरला पोहोचले त्यानंतर त्यांना दोन बसमधून हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा येथे नेण्यात आलं. हे यात्रेकरू विशेष नमाजमध्ये सहभागी होणार आहेत.विभागीय वाणिज्य अधिकारी आणि यात्रा अधिकारी विवेकानंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे यात्रेकरू स्पेशल ट्रेननं अजमेरला पोहोचले. अजमेर रेल्वे स्थानकातून त्यांना दोन बसनं अजमेरच्या केंद्रीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयात नेण्यात आलं.तिथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. गेल्या वर्षी 232 यात्रेकरू या उरूसात सहभागी होण्यासाठी भरतामध्ये आले होते, मात्र यावेळी फक्त 67 यात्रेकरूच भारतामध्ये आले आहेत.

स्पेशल ट्रेननं भारतात आगमन

या यात्रेकरूंचं स्पेशल ट्रेनन भारतामध्ये आगमन झालं, भारत सरकार आणि राजस्थान सरकारकडून त्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. 67 प्रवाशांसाठी तब्बल 680 सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत.पोलीस अधिकारी रामावतार यांनी सांगितलं की या यात्रेकरूंची रेल्वे स्थानकावरच सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना चोख पोलीस बंदोबस्तामध्ये दोन बसने अजमेरच्या केंद्रीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयात नेण्यात आलं.तिथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

भाविकांच्या संख्येत घट 

दरम्यान गेल्या वेळी या उरूसासाठी भारतात येणाऱ्या पाकिस्तानी यात्रेकरूंची सख्या तब्बल 232 इतकी होती, मात्र यावेळी त्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. यावेळी केवळ 67 यात्रेकरूच भारतामध्ये आले आहेत. मात्र भारत सरकारकडून त्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनपासून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Follow Us
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन