AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींच्या खास मंत्र्याने दिली मोठी अपडेट; म्हणाले, आपल्या देशात…

India Lockdown Update : जागतिक पातळीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एका बड्या मंत्र्याने भाष्य केले आहे.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींच्या खास मंत्र्याने दिली मोठी अपडेट; म्हणाले, आपल्या देशात...
Lock DownImage Credit source: Google
| Updated on: May 16, 2026 | 10:34 PM
Share

युद्धामुळे जागतिक पातळीवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात येत आहे. कारण कोरोना काळात भारतात लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लॉकडाऊन बाबत लोकांच्या मनात भीती आहे. अशातच आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. यावर पंतप्रधान मोदींच्या खास मंत्र्याने भाष्य केले आहे.

भारतात लॉकडाऊन लागणार?

भारतात लॉकडाऊन लागणार का? यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘सध्या भारतातील परिस्थिती इतकी गंभीर नाही की लॉकडाऊनसारखी पावले उचलावी लागतीस. मात्र, वाईट परिस्थितीसाठी आतापासूनच सतर्क राहणे आवश्यक आहेत.’रिजिजू यांच्या या विधानामुळे भारतात तुर्तास तरी सरकार लॉकडाऊन लावण्याचा विचार करत नाहीये हे स्पष्ट झाले आहे.

भारतात गंभीर परिस्थिती नाही – रिजेजू

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. तसेच अनावश्यक खर्च टाळण्यास सांगितले होते. रिजिजू यांनी याच विधानाच्या संदर्भात बोलताना एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘भारतात सध्या गंभीर संकटाची परिस्थिती नाही. मात्र पश्चिम आशियातील तणावामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. व्यापार मार्गांवरही त्याचा परिणाम होत आहे. भारताने पश्चिम आशियात तणाव निर्माण केलेला नाही. पण दुर्दैवाने आपण या संकटाच्या प्रभावात ओढले जात आहोत. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या पातळीवर तयारी करावी लागेल. आपण इतरांच्या मदतीवर अवलंबून राहू शकत नाही.’

देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर

पुढे बोलताना रिजेजू यांनी सांगितले की, ‘गेल्या 12 वर्षांपासून पंतप्रधान मोदी देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. तसेच परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भारत अजूनही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. त्यामुळे अशा जागतिक संकटाच्या काळात पंतप्रधानांचे ऐकणे गरजेचे आहे. कारण हा सामान्य काळ नाही.’

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.