AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Satta Sammelan | ईडीच्या कारवाया किती टक्के राजकारण्यांवर?; अमित शाह यांनी आकडाच सांगितला

ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी ईडीच्या कारवाया या किती टक्के राजकीय नेत्यांवर केल्या जातात याबाबतचा थेट आकडाच सांगितला.

WITT Satta Sammelan | ईडीच्या कारवाया किती टक्के राजकारण्यांवर?; अमित शाह यांनी आकडाच सांगितला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 27, 2024 | 9:57 PM
Share

नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात सहभागी झाली. त्यांनी या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर मोकळेपणाने उत्तर दिलं. ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी ईडीच्या कारवाया या किती टक्के राजकीय नेत्यांवर केल्या जातात याबाबतचा थेट आकडाच सांगितला. “आमची भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या घरातून कोरोडो रुपये मिळाले आणि कारवाई करू नका म्हटलं तर कसं चालेल. तृणमूलच्या मंत्र्याकडे मशीनने मोजावे लागतील एवढे पैसे मिळतील तर कारवाई करू नये का. ईडीने जेवढ्या कारवाया केल्या. त्यातील पाच टक्के राजकारणी आहेत. तर ९५ टक्के इतर लोक आहे. पण अफवा पसरवली जात आहे. जे लोक भ्रष्टाचार करत आहेत, तेच लोक हा भ्रम फैलावत आहेत”, असं अमित शाह म्हणाले.

“भारतातील सर्वात चांगले वकील काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लढलं पाहिजे. एजन्सीच्या कारवाईबाबत काँग्रेसने तरी बोलू नये. इंदिरा गांधी यांनी कारणाशिवाय लोकांना आतमध्ये टाकलं होतं. वर्तमानपत्रावरही बंदी घातली आहे”, असं शाह म्हणाले.

‘काँग्रेसने दहा वर्षात भ्रष्टाचार केला’

“भाजपमध्ये कोणी आले असले तरी कुणाचीही केस भाजपने मागे घेतली नाही. काँग्रेसने दहा वर्षात भ्रष्टाचार केला होता. त्यांच्या सरकारने सीबीआय चौकशी लावली होती. कशासाठी चौकशी लावली होती. कॉमनवेल्थवर कुणी चौकशी केली तर काँग्रेसने केली. काँग्रेसने त्यांच्या सरकारात त्यांच्याच विरोधात ४० केसेसमध्ये चौकश्या लावल्या होत्या. तेव्हा कुणाचं सरकार होतं. ईडीने जे लाखो रुपये जप्त केलं आहे, तो ब्लॅक मोहिमचा भाग आहे. ९५ टक्के काळा पैसा इतरांचा आहे. तर ५ टक्के पैसा फक्त राजकारणाचा आहे”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

यावेळी अमित शाह यांनी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. “रिलीजिअस मायनॉरिटीला नागरिकत्व देण्याचं नेहरूचं स्वप्न होतं. आम्ही ते पूर्ण केलं. आम्ही काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. तीस वर्षानंतर आम्ही नवं शैक्षणिक धोरण आणलं. ४० वर्षापासून महिलांच्या आरक्षणाची चर्चा होती. कोणी देत नव्हतं. आम्ही महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. त्यांचा धोरणांमध्ये सहभाग आणला. न्याय संहिता, नागरिक संहिता, भारतीय साक्ष संहिता आम्ही इंग्रजांचे कायदे रद्द केले. राम मंदिर उभारलं”, असं अमित शाह म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!