गाणं पाहिजे तर असं, पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी भरत नाही मन, 30 वर्षांपासून सर्वांचं आवडतं

3 मिनिट 44 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे गेल्या 30 वर्षांपासून प्रत्येक वयोगटातील तरुणांचं प्रचंड आवडतं. एकदा ऐकलं तर दिवसभर हेच गाणं गुणगुणतात लोक.

| Updated on: Jul 19, 2026 | 9:55 AM
1 / 5
90 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कॅसेट प्लेअर, रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, साधना सरगम यांसारख्या गायकांची गाणी घराघरांत ऐकली जात होती.

90 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कॅसेट प्लेअर, रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, साधना सरगम यांसारख्या गायकांची गाणी घराघरांत ऐकली जात होती.

2 / 5

आजही ही गाणी ऐकली की जुन्या आठवणी ताज्या होतात. अशाच गाण्यांपैकी ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ हे गाणे तब्बल 32 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील हे लोकप्रिय रोमँटिक गाणे साधना सरगम आणि पंकज उधास यांनी गायले होते.

3 / 5

या गाण्यात सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. साधे पण हृदयस्पर्शी बोल आणि मधुर संगीतामुळे हे गाणं प्रदर्शित होताच सुपरहिट ठरले. आजच्या नव्या पिढीलाही हे गाणे तितकेच आवडते.

4 / 5

सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर या गाण्याच्या अनेक रील्स व नव्या आवृत्त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, गाण्याच्या 4K व्हर्जनला यूट्यूबवर 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

5 / 5

‘मोहरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव राय यांनी केले होते. चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन, नसीरुद्दीन शाह, परेश रावल आणि पूनम झावर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुमारे 3.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 22 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us