Vaibhav Sooryavanshi : खरंच याला म्हणतात प्रामाणिकपणा, वैभव सूर्यवंशीच्या प्रश्नावर कपिल देव यांचं रोखठोक उत्तर
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे की त्याने मोठ-मोठ्या गोलंदाजांसमोर बिनधास्त फलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड सारख्या गोलंदाजांना त्याने झोडून काढलं आहे. आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये वैभव तुफान फॉर्ममध्ये आहे.

वैभव सूर्यवंशी इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन गाजवतोय. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या या ओपनरने 10 सामन्यात 404 धावा फटकावून क्रिकेट जगताला हैराण करुन सोडलं आहे. त्याचा हा फॉर्म पाहून लवकरात लवकर त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

वैभव सूर्यवंशीने चालू आयपीएल सीजनमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकवली आहेत. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध त्याने 36 चेंडूत शतक झळकावलं. आयपीएल इतिहासात कुठल्याही भारतीय फलंदाजाने झळकवलेलं हे दुसरं वेगवान अर्धशतक आहे.

भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन कपिल देव यांना वैभव सूर्यवंशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. कपिल देव स्पष्ट शब्दात म्हणाले की, 'ते रोज क्रिकेट पाहत नाहीत. म्हणून ठामपणे बोलणं योग्य होणार नाही'

कपिल देव रविवारी पत्रकाराशी बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की, "मी त्याला जास्त पाहिलं नाहीय. टीव्हीवर जे दिसतं तेच मी पाहतो. अशावेळी पूर्ण माहितीशिवाय कुठलही मत मांडण योग्य होणार नाही"

कपिल देव म्हणाले की, "अशा खेळाडूंबद्दल सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि हर्षा भोगले यांच्यासारखे एक्सपर्ट जास्त चांगलं विश्लेषण करु शकतात" पण कपिल देव यांनी काही बोलण्याआधीच मैदानावर वैभव सूर्यवंशीची कामगिरी सर्वकाही बोलून जातेय