प्रत्येक मुलीला न आवडणार गाणं, जे ऐकताच अनेक मुली ढसा-ढसा रडतात, जवळ असणारा पण भावनिक होतो
प्रत्येक मुलीला न आवडणार गाणं, जे ऐकू आलं तरी मुली ढसा-ढसा रडतात. अनेक पिढ्या बदलल्या पण या गाण्याची क्रेझ कमी झाली नाही. आजही हे गाणं ऐकताच पुरुष देखील रडतात.

बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. ज्यामध्ये काही गाणी प्रेक्षकांना इतकी भावतात की ते कानावर ऐकू येताच काहींना अश्रू अनावर होतात. असच एक मुलींवर आधारित भावनिक गाणं, जे ऐकताच मुली ढसा-ढसा रडतात.

भारतीय विवाहसोहळ्यात अनेक गाणी वाजवली जातात. मात्र, वधूच्या विदाईच्या क्षणी जे गाणे वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आले आहे, ते म्हणजे "बाबुल की दुआएं लेती जा". हे गाणे सुरू होताच नववधूसह उपस्थित नातेवाईकांचेही डोळे अनेकदा पाणावतात.

मुलीच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक असलेल्या विदाईशी हे गाणं घट्ट जोडले गेले आहे. लग्नानंतर मुलगी माहेरचा निरोप घेऊन सासरी जात असताना आई-वडिलांपासून, भावंडांपासून आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांपासून दूर जाण्याची भावना प्रत्येकाच्या मनाला चटका लावते.

अशा वेळी 'बाबुल की दुआएं लेती जा' हे गाणं त्या क्षणातील भावना अधिक तीव्र करते. त्यामुळे अनेक विवाहसोहळ्यांमध्ये विदाईच्या वेळी हे गाणे आजही आवर्जून वाजवले जाते.

या गाण्यातील शब्द मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच आई-वडिलांच्या मनातील प्रेम, काळजी आणि विरह व्यक्त करतात. म्हणूनच अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. पिढ्या बदलल्या, विवाहसोहळ्यांचा थाट बदलला, आधुनिक गाण्यांचा ट्रेंड आला, तरी विदाईच्या प्रसंगी या गाण्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही.